मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करत अर्थसंकल्प ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५ – २६ …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …
Read More »बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाचे शाळांसाठी नवे नियम सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे
बदलापूर येथील दोन शालेय मुलींवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूरच्या रहिवाशांनी आंदोलन काल तब्बल ९ तास आंदोलन केले. त्यानंतर अशा दुर्घटनांना अटकाव करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना घ्यावयाच्या मार्गाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या शालेय व क्रिडा विभागाकडून आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार या शाळा व परिसरात विद्यार्थी, …
Read More »नीट-युजी पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे केली तक्रार
सीबीआयने ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET-UG मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी आज २३ जून रोजी सांगितले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून NEET परीक्षेच्या संचालनातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील इतर …
Read More »केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …
Read More »१२ वीच्या पेपरफुटीप्रश्नी अजित पवारांचा सवाल, सरकार काय झोपलंय का? शिक्षण मंत्री दिपक केसरकर गैरहजर अखेर महसूल मंत्री विखे-पाटील यांनी संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याची दिली ग्वाही
नुकतेच १० वीचे पेपर संपून इयत्ता बारावीचे पेपर सुरु आहेत. कॉपीमुक्त राज्याचा संकल्प केला. मात्र त्या संकल्पनेचा पुरता फज्जा उडाला. त्यातच आज १२ वी चा गणिताचा पेपर सुरु होण्यापूर्वीच सकाळीच फुटल्याची घटना उघडकीस आली. याबाबतचे वृत्त पसरताच विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी मुद्दा उपस्थित करत म्हणाले, …
Read More »दहावी-बारावीच्या या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क सरकारकडून माफ कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर …
Read More »शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ …
Read More »बेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे रखडलेल्या प्रत्येक विभागातील भर्ती प्रक्रियेला हळुहळू सुरुवात होत असून सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली. त्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे …
Read More »फी भरली नाही म्हणून शिक्षण रोखणाऱ्या शाळांची माहिती द्या शिक्षणाधिकारी आणि शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून किंवा परिक्षेस बसण्यापासुन वंचित ठेवल्यास ही बाब पालकांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून …
Read More »