Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …

Read More »

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …

Read More »

मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी

मुंबई: प्रतिनिधी मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार …

Read More »

मजुरांच्या दैन्यावस्थेबद्दल आयोगाने राज्याला नव्हे तर केंद्राला नोटीस बजावावी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी …

Read More »

महाराष्ट्रातून किती स्थलांतरीत कामगार जाणार आहेत? जाणून घ्या स्थलांतरीत कामगारांपर्यत पोहचण्यात नोडल- कामगार अधिकारी कमी पडतायत

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांनी पायीच आपले घर गाठण्यासाठी रेल्वे रूळाच्या सोबत निघाले. मात्र पहाटेच्या अंधारात रेल्वे मालवाहतूक गाडीने त्यांच्या जीवाचा ठाव घेतला. या घटनेमुळे राज्यातील प्रशासकिय व्यवस्था, कामगार विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमके काय काम करते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्य सरकारने स्थलांतरीत कामगारांना …

Read More »

राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० …

Read More »

लष्कर मुंबईत येणार नाही, पण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिंवसेदिवस वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. मात्र काहीजणांकडून लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळले जात नाहीत. तसेच राज्यातील पोलिसही ड्युट्या करून थकत, आजारी पडत आहेत. लॉकडाऊन काटेकोर पाळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांना काही प्रमाणात आराम देण्यासाठी आपण …

Read More »

नवे पालिका आयुक्त चहल, परदेशी पालिकेतून आऊट तर भिडे, जयस्वाल इन मदत व पुर्नवसनच्या निंबाळकरांना बांधकाम

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव नियुक्त करण्यात आले. तर त्यांच्या ठिकाणी नगरविकास विभागाचे सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरिक्त भार असलेले इत्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच …

Read More »

मुख्यमंत्री, महसूलमंत्री: साहेबराव गायकवाड यांच्या दुर्दैवी मृत्यूची सीआयडी चौकशी करा महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ह्यांच्या अकस्मिक मृत्यूची सी. आय. डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे कै. गायकवाड यांची अवघ्या पाच महिन्यांच्या आत बदली करण्याचा आदेश कोणाच्या सहीने निघाला, ती माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली. …

Read More »

त्या घटनेने पवारांना दु:ख, म्हणाले भरारी पथक नेमा केंद्र व राज्याने एकत्रित येवून हा प्रश्न सोडवावा

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी होतीच शिवाय कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने मनाला यातना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे. दरम्यान पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर …

Read More »