Breaking News

राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० ने वाढली आहे.
तसेच राज्यातील मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ असून आजही ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या १९ हजार ६३ वर पोहोचली आहे. आजपर्यत ३४७० रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
आज राज्यात ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील १० , जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७३१ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,१२,३५० नमुन्यांपैकी १,९२,१९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९,०६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,५५२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५२.६४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून ३४७० रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात २,३९,५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १२१४२ ४६२
ठाणे           १०१
ठाणे मनपा ७२४
नवी मुंबई मनपा ७१६
कल्याण डोंबवली मनपा २८४
उल्हासनगर मनपा १५
भिवंडी निजामपूर मनपा २१
मीरा भाईंदर मनपा १९२
पालघर ४६
१० वसई विरार मनपा १९४
११ रायगड ८१
१२ पनवेल मनपा १३२
ठाणे मंडळ एकूण १४६४८ ४९७
१३ नाशिक ४७
१४ नाशिक मनपा ६०
१५ मालेगाव मनपा ४५० १२
१६ अहमदनगर ४४
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा २४
२० जळगाव ८२ १२
२१ जळगाव मनपा १४
२२ नंदूरबार १९
नाशिक मंडळ एकूण ७५७ ३२
२३ पुणे ११०
२४ पुणे मनपा १९३८ १३२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२९
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १७९ १०
२८ सातारा ९४
पुणे मंडळ एकूण २४५६ १५१
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १७
कोल्हापूर मंडळ एकूण ७३
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ४१८ १२
३७ जालना १२
३८ हिंगोली ५८
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ४९५ १३
४१ लातूर २५
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा २९
लातूर मंडळ एकूण ६१
४७ अकोला
४८ अकोला मनपा ११२
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ७६ १०
५१ यवतमाळ ९५
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ३२१ २२
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा २१०
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण २१८
इतर राज्ये ३४
एकूण १९०६३ ७३१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *