Breaking News

Tag Archives: chief minister

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून कामकाजाचे १५ दिवस चालणार

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या …

Read More »

“सध्या रिक्षावाला, चहा वाल्याचे दिवस चांगले”, म्हणणाऱ्या अजित पवारांचे दिवस नेमके कसे? गडचिरोलीतील ‘शासन आपल्या दारी’साठी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार जाणार

बरोबरच चार महिन्यापूर्वी मार्च महिन्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून पहिलाच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले. त्यानंतर यथावकाश अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सांगताही झाली. त्यावेळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रथे प्रमाणे त्यावेळचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि एकदंरतच अधिवेशनातील कामकाजाबद्दल पोटतिडकीने विधिमंडळ व मंत्रालय वार्तहर संघात आयोजित …

Read More »

अजित पवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम फक्त ‘त्या’ तिघांना माहित ? ‘या’ प्रमुखांनाही नव्हता छगन भुजबळांसह शिंदे गटाच्या आमदारांनाही नव्हती कल्पना

नुकतेच राज्यात राजकिय उलथापालथ होत महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर इतक्या मोठ्या शपथविधीची माहिती कोणालाच कशी नव्हती अशी चर्चा अनेक प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी आणि राजकिय वर्तुळातील बड्या नेत्यांमध्ये सुरु झाली आहे. परंतु या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय गोदावरी नदीतील पाणीसाठी १४ किमी बोगद्याने वळविणार

राज्य सरकारचा नुकताच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासह आलेल्या ८ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पहिल्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोदावरी प्रवाह वळण प्रकल्प, नागपूरातील शिवराज फाईन आर्टच्या ३५ कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्येला मान्यता, उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना …

Read More »

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय …

Read More »

अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक टोला, एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत…. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून …

Read More »

अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार

राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडून ऑफर… सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर बुलडोझर चालविणार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘धडक मोर्चा’चं आज ( १ जुलै ) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. यावेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं सरकार आल्यानंतर …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … ईडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी …

Read More »