Breaking News

Tag Archives: bjp

नाना पटोलेंचा टोला, एकनाथ शिंदेंचे चांगले व्हावं हिच आमची सदिच्छा, पण आता कुठे सुरुवात… चंद्रशेखर बानवकुळे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून शिंदेना काढला चिमटा

भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

काँग्रेसची टीका, बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला पाठिंबा देणारा भाजपा मनुवादी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान

जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

जयंत पाटील यांचे भाकीत,…तर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय. परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी …

Read More »

टीकेची झोड उठल्यानंतर अखेर भाजपा प्रदेशाध्यक्षांची सारवा सारव, तो व्हिडिओ अर्धवट… जागा वाटपावरून केलेल्या विधानावरून घुमजाव

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून कधीही अंतिम निकाल येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात जाण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूकीत …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक सवाल, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल? बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींच्या वसईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित …

Read More »

त्या प्रकाशित वृत्तावर अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचा खुलासा, मला व माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा… अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरवर फडणवीसांचा सभागृहात खुलासा

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गावदेवी मलबार हिल पलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील नेमकी माहिती काय असा थेट सवाल केला. अजित पवार यांच्या प्रश्नार्थक माहितीमुळे …

Read More »

शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या …

Read More »

मविआ बैठकीनंतर नाना पटोलेंचा विश्वास, भाजपाला सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल काँग्रेस, एनसीपी व शिवसेनेच्या संघटीत ताकदीवर पुन्हा मविआच सत्तेवर येणार: बाळासाहेब थोरात

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची …

Read More »

नाना पटोलेंची टीका, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा पण शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी नाही जुनी पेन्शन प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा अन्यथा खुर्ची खाली करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही मुद्द्यांवर केवळ सकारात्मक आहे असे म्हणून वेळ मारून नेते पण ठोस निर्णय घेत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी २० लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन लागू केल्यास आर्थिक बोजा पडेल असे सांगणाऱ्या सरकारकडे मुठभर उद्योगपतींची कोट्यवधींची कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे …

Read More »

भाग-२: जिल्हा रूग्णालयात कोट्यावधीं रूपयांच्या करामती, फक्त पुरवठा दारांचा फायदा, शासनाचे नुकसान कॅगने सूचना करूनही अनेक गोष्टींची बिले, रजिस्टर दाखविलीच गेली नाहीत

ठाणे जिल्ह्यातील आदीवासी गावांपर्यंत योग्य ती आरोग्य यंत्रणा पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आला आहे. आदिवासींसह सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा म्हणून दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समिती तर विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. …

Read More »