राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा …
Read More »शरद पवार, अजित पवारांच्या बालेकिल्यातील कामगार प्रश्नी भाजपा मंत्र्याची मध्यस्थी
राज्याच्या राजकारणातील हुकमी एक्का आणि बारामतीसह दौंड पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणारे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकिय बालेकिल्ल्यात आतापर्यंत कोणी घुसखोरी करू शकले नाही. मात्र पवार काका-पुतण्यात झालेल्या राजकिय मतभेदानंतर दौंड तालुक्यातील प्रसिध्द वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचे ४२ दिवस संप सुरु होता. वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यातील कोणत्याही …
Read More »डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…
मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, …मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार… अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पक्षातील पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा आरक्षण दिले गेले, मात्र ते दोन्ही न्यायालयांनी रद्दबातल केले अशावेळी कायद्याच्या कसोटीवर आरक्षण देत असताना आणि …
Read More »नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत
२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …
Read More »शालिनीताई पाटील यांची भविष्यवाणी, तर अजित पवार तीन महिन्यात तुरूंगात
राज्यात १०५ कोटींचा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहोत असे सांगतानाच स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री मिळविण्यासाठी बंद करणारे अजित पवार पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील त्यांना कोणत्याही निवडणूका लढविता येणार नाही असा खळबळजनक दावा माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केला. शालिनीताई पाटील म्हणाल्या की, …
Read More »बंडाच्या आरोपावरून शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार
मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला …
Read More »अजित पवार यांची घोषणा, फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी
महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती…त्या भेटी-गाठी कौटुंबिक
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉंईट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात लोकसभा निवडकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या चिन्हावर निवडणूका लढविण्याच्या अनुशंगाने चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, “मोठ मोठे आकडे सांगुनिया थकले, दिले नाही काही बळीराजा”
अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. परंतु अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सरकारने शेतकऱ्यांना ठोस काही दिले नाही. हिवाळी अधिवेशनाकडे बळीराजाचे डोळे लागलेले असताना ट्रीपल इंजिन सरकारने जुन्याच घोषणा नव्याने करून शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असल्याची टीका विधानसभा …
Read More »