मुंबईः प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना जनतेचे सेवक या नात्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील कार्यरत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तसे पत्र राज्य शासनास दिले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत राज्यातील जनतेबरोबर शासनाचे सर्व अधिकारी आहेत. सामाजिक बांधीलकेतून पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑगस्ट महिन्याच्या पगारातून ही रक्कम परस्पर कपात करून ती थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करावी अशी विनंतीही महासंघाने शासनास केली आहे.
Tags cm fadnavis flood situation gazetted officer at mantralaya kokan and western maharashtra
Check Also
एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे
केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …