Breaking News

राजकारण

राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे यांच्या पुतण्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या बंधुचे चिंरजीव अर्थात पुतणे अवधूत तटकरे यांनी आज अखेर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबऴ उडाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. माजी आमदार …

Read More »

शिंदे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी अग्रिम मिळणार

दिवाळीला आता काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त अग्रिम देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण उत्साहात साजरा होणार आहे. राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे… आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा… येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा …

Read More »

आणि भुजबळांनी सांगितले संपत्ती कशी आली आणि शिवसेना सोडल्यानंतरचा किस्सा

ncp leader chhagan bhujbal on his birthday छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, …

Read More »

महाराष्ट्र सदनाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व

दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील …

Read More »

उध्दव ठाकरेंचे म्हणालेः आम्ही धक्काप्रुफ, वादळ निर्माण करणारे सोबत

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख करत शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली. मात्र आता आम्ही धक्काप्रमुफ असून वादळं निर्माण करणारी माणसं आमच्यासोबत आहेत असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे खुले आव्हान, असेल हिंमत तर या मैदानात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, आज प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागतं आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे यांना जबरदस्त आव्हान ; शशी थरुर यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. या निवडणुकीत गांधी नेहरु परिवाराचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांना ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी जबरदस्त आव्हान दिले. पी. चिदंबरम, सैफुद्दिन सोज, ए.के.ॲंथनी यांच्या सह अनेक नेत्यांच्या मुलांनी शशी थरुर यांना पाठिंबा दिला असून माजी केंद्रीय मंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील …

Read More »