Breaking News

राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, हे जनाधार नसणारं सरकार मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रा पुढे आले...

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे – फडणवीस सरकारवर केला. आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात पार पडली. त्यानंतर …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या त्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, पक्षातील पदांसाठी मतदानच घेतले नाही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीतून उत्तर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी प्रलंबित आहे. तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिवसेना पक्षाची घटना आणि पदांची निर्मिती करण्यात आली. देशात लोकशाही आहे, असं …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी, हिवाळी अधिवेशन नाही घेतले किमान अर्थसंकल्पीय… कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली मागणी

नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. तसेच अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही आप्पासाहेबांची भेटही घेत …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा, तर उद्योगपतीही मुख्यमंत्री-पंतप्रधान होऊ शकतात न्यायालयाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते

जवळपास मागील सात महिन्यापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाची की शिंदे गटाची यावरून राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सातत्याने सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच भाजपाकडून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी धोरण राबविले जात असून उद्योगपतींच्या आर्थिक …

Read More »

आदित्य ठाकरेंची टीका, कितीही नेते येऊ दे गल्लीगल्लीत फिरायला लावणार वरळीतील शिंदे-फडणवीसांच्या सत्कारावरून साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ७ फेब्रुवारी रोजी वरळीत जाहिर सत्कार होणार आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊ दे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंच्या संवाद …

Read More »

पिंपरी-चिंचवड उमेदवारीवरून अजित पवार म्हणाले, बोलणं झालं उध्दव ठाकरेंचा आघाडीला पाठिंबा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं यासाठी प्रयत्न

पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने माघार घेतली. मात्र ठाकरे गटाचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी …

Read More »

थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोले म्हणाले, शुभेच्छा, त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो माध्यमांशी थोरात बोलत असतील तर त्यांनीच विचारावं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो अशा सकाळीच शुभेच्छा दिल्या. तसेच थोरात यांनी राजीनामा दिला …

Read More »

अजित पवारांनी पुन्हा केला गौप्यस्फोट, बाळासाहेब थोरातांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना थोरातांना विचारल्यानंतर त्यांनीच माहिती दिल्याचा केला दावा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला असून सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीवरून आणि सत्यजीत तांबेच्या विजयाचे भाकित करणारे याशिवाय सत्यजीत तांबे हे भाजपासोबत जाणार नसल्याचे आणि शिवसेनेतील बंडाच्या माहितीचा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »