देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण ५ जी नेटवर्कमध्ये रिलायन्स जिओचा ८५ टक्के वाटा आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी दृष्टीकोनाचा संदर्भ देत आकाश अंबानी म्हणाले, “तुम्ही आम्हाला भारताला हायटेक पद्धतीने आत्मनिर्भर बनवण्यास सांगितले होते. आम्ही यावर काम केले आहे, जीओ चे ५ जी रोलआउट १००% इन-हाऊस ५ जी स्टॅकवर कार्य करते, पूर्णपणे भारतीय प्रतिभांनी डिझाइन केलेले आणि विकसित केले आहे. “आज १२ कोटींहून अधिक ५ जी वापरकर्त्यांसह, भारत जगातील ५ जी सक्षम देशांपैकी एक आहे.
जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाले, “पंतप्रधानांना वचन देतो की आम्ही तंत्रज्ञानाला पुढे घेऊन डिजिटल स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधू. जे तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीसह भारताला जगातील सर्वात प्रगत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेल. रिलायन्स जिओने दुर्गम भागांना जोडण्यासाठी जिओ स्पेस फायबर सेवा सुरू केली आहे. फायबर केबलद्वारे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसलेल्या ठिकाणांसाठी ही सेवा सर्वोत्तम आहे.