Breaking News

राज ठाकरे म्हणाले, अजूनही मला निवडणूका दिसत नाहीत पण फेब्रुवारीमध्ये होतील

मागील काही दिवसांपासून शिंदे गट-भाजपा आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे काही बोलणार का? अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांनी भाजपा, काँग्रेस, उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवित मला अजूनही राज्याच्या वातावरणात निवडणूका दिसत नाहीत. मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. …

Read More »

बोम्मईंच्या विधानावरून वातावरण तापलं असतानाच तिकोंडीत मात्र कर्नाटकात जाण्याचा निश्चय गावाच्या वेशीवरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा लावला फोटो

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मात्र दुसरीकडे याच गावातील नागरिकांनी आमच्या पाण्याचा प्रश्न जो सोडविल त्या राज्यात जाण्याची तयारी तिकोंडीतील गावकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मोठा फोटोही …

Read More »

ठाकरेंच्या आव्हानावर शिंदे गटाच्या संजय गायकवाडांचे प्रतिआव्हान, एक तरी पुरावा दाखवा

नुकत्याच चिखली येथे झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हणाले काही जण रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. हे मी म्हणालो नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचे म्हणाले. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल तर जाहिर सांगावं की, …

Read More »

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांची नावे घेत राणे बंधूवर साधला निशाणा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तास्थानी विराजमान होऊन जवळपास चार महिने झाले. या चार महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाबरोबर भाजपामधील अनेक आमदारांचे लक्ष्य लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून आधीच नाराज आहेत. तसेच राज्यमंत्रीचीही अद्याप नियुक्ती झाली नाही. …

Read More »

अर्थमंत्री सीतारामन यांनी बोलाविलेल्या बैठकीला व्यापार संघटना म्हणते, हा एक विनोद..

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी रेशन दुकानात मोदींचा फोटो का नाही म्हणून रेशन दुकानदाराशी आणि तेथील प्रशासनाशी हुज्जत घातली. त्यानंतर अमेरिकेत गेल्या तेथील पत्रकार परिषदेला संबोधित करताना रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय असे सांगत स्वत:चेच हसे करून घेतल्याची घटना ताजी असताना …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार, त्यांची मानसिकता ढळली

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. काल चार महिन्यानंतर बुलढाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातही उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून चांगलाच निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू

मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त …

Read More »

संभाजी राजे यांचा इशारा, तर उठाव होणारच…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा केले. त्यातच शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केल्याने संभाजी राजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यांरींना काढून टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली नसल्यान अद्याप त्यांनी केलेल्या काही …

Read More »

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले, जर केवळ न्यायाधीशांनीच निर्णय घ्यायचे असतील तर…

मागील काही दिवसांपासून न्यायाधीश निवडी आणि नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्थापित असलेल्या कॉलेजियम पध्दतीवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरण रिजिजू यांनी आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पध्दतीवरून निशाणा साधला. लाईव्ह लॉ या संकेतस्थळाशी बोलताना किरण रिजिजू म्हणाले, …

Read More »