Breaking News

Editor

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …

Read More »

राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात

केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज …

Read More »

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर

भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने संविधान दिन ते महापरीनिर्वाण दिन अशा १२ दिवसीय संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले असून हार फुलांऐवजी वह्या पेन पुस्तक संगणक मोबाईल आदी शैक्षणिक साहित्य देवून या यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. भीम आर्मीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनापासून ६ डिसेंबर …

Read More »

संभाजी राजे म्हणाले, ते असं का बडबडतात? हात जोडून विनंती कोश्यारींना हटवा

आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्ये करत वाद उत्पन्न करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे यांनी खोचक टीका करत मी हात जोडून विनंती करतो की पंतप्रधान मोदींनी राज्यपाल …

Read More »

रोहित पवारांचा टोला, तेव्हा गप्प असणारी मंडळी आता सावरकरप्रश्नी रणकंदन माजवतायत

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आणि जाहिर केलेल्या पत्रामुळे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकेची झोड उठवित कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यावेळी गप्प असणारे आता सावरकर …

Read More »

राज्यपाल कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवराय पुराने जमाके के…

भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल म्हणून आल्यापासून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणान वाद निर्माण करतात. कधी सावित्रीबाई फुले यांच्यावरून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवरून तर कधी मुंबईतील परप्रांतीय नागरीक बाहेर काढले तर काय राहील असली वक्तव्य करत नेहमीच वाद निर्माण करत आले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर …

Read More »

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भात जलसंधारणाची मोठी कामे होणे गरजेचे

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपाने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, …तर कारवाई राहुल गांधीं यांच्यावर करू

मागील दोन-तीन दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्यावर सहमत नसल्याचे सांगितले आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी विरोधात आंदोलन केले. याशिवाय राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांनीही आव्हान …

Read More »

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, पालिकेत सध्या तीन टी सुरु

मुंबई महापालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत सध्या तीन टी सुरु असून ते तीन टी म्हणजे टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु असल्याचा खोचक टोला लगावत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय  डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून …

Read More »