Breaking News

Tag Archives: ncp jayant patil

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना या देशातील निवडणूका महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणा; आठ दिवसापूर्वीच्या ट्वीटची जयंत पाटील यांनी करुन दिली आठवण

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे …

Read More »

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत विदयार्थ्यांवर अन्याय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत ८३३ विदयार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याचा विचार करुन राज्यसरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह ( परिवहन) विभागातंर्गत २३ डिसेंबर २०१६ ला …

Read More »

मोदी सरकारवर जनता नाराज नाही तर रागावलीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सरकारने लाजेखातर म्हणून आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले असल्याची जोरदार टिका करत देशातील जनता नाराज नाही तर ती मोदींवर रागावली आहे. कारण त्यांनी देशातील जनतेला फसवलं आहे. त्यामुळे ही जनताच बदला घेईल हे निश्चित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले. ठाणे येथे आय़ोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते …

Read More »

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. डॉ.बाबासाहेब …

Read More »

राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर आणणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

पालघरः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी समर्थपणे पाय रोवून कसा ठेवला आहे ते पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरुन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे या बळावर पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून काम करुया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पालघरमध्ये जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यामध्ये केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार …

Read More »

सरकारला दूर करण्याचे पहिले पाऊल शेतकरी वर्गातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी या देशातील शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळे चिडून दिल्लीमध्ये पोलिसांनी अतिरेकी कारवाई केली आणि शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु देशातील शेतकरी नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला घाबरणार नाही आणि समर्थपणे एकत्र येवून हे सरकार दूर करण्याचे पहिले पाऊल टाकेल असा विश्वास …

Read More »

राजकीय फायदयासाठी सरकारी पैसा वापरल्याने अर्थव्यवस्था कोलमडते आमदार जयंत पाटील यांची वित्तीय आयोगाकडे मांडली व्यथा

मुंबईः प्रतिनिधी जीएसटी कौन्सिल ही जवळपास सर्वच निर्णय राजकीय हेतूने प्रेरित होवून निवडणुका आल्या की,जीएसटीतून करांचे दर कमी करायचे असा प्रघात आज पडत आहे. पूर्वी व्हॅटची व्यवस्था असताना आम्ही सर्व राज्यांचे अर्थमंत्री एकत्र बसून त्यासंबंधी निर्णय घेत होतो मात्र सध्या जीएसटी कौन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असल्याने विविध करांबद्दल राजकीय हेतूने …

Read More »

अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले स्वागत

मुंबईः प्रतिनिधी नवी मुंबईमधील अल्पसंख्यांक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, नसीम सिद्दीकी …

Read More »

शिवसेनेला चुचकारत मुख्यमंत्र्यांची नाणार प्रकल्पाबाबत सावध भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतरही संभ्रम कायम

नागपूर : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून नाणार रिफायनरी प्रकल्पावरून विधानसभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तरीही या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना नाणार राहणार कि जाणार याबाबत स्पष्टपणे न सांगता याबाबत सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांशी आणि स्थानिकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार …

Read More »

राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा सल्ला

नवी मुंबई : प्रतिनिधी आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Read More »