Breaking News

Tag Archives: MSP

केंद्र सरकार एमएसपी दराने डाळी खरेदी करण्याच्या तयारीत बफर स्टॉक आणि किंमती वाढू नयेत म्हणून डाळींची खरेदी

दोन वर्षे वाढलेल्या पातळीवर राहिल्यानंतर, बाजारातील डाळींचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) खाली असल्याने, सरकार बेंचमार्क दराने या वस्तूंची खरेदी वाढवण्याच्या तयारीत आहे. बफर स्टॉकमध्ये घसरण होत असताना, शेतकरी सहकारी नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) – या संस्था साठा वाढवण्याचे आणि शेतकऱ्यांना फायदेशीर भाव मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवत …

Read More »

एमएसपीच्या किंमतीत ६ टक्क्याची वाढ ५ हजार ६५० रूपये प्रति क्लिटंल तागाला दर मिळणार

आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने बुधवारी २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) ६% वाढ करून ५,६५० रुपये प्रति क्विंटल केली. अधिकृत निवेदनानुसार, “या निर्णयामुळे… शेतकऱ्यांना अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ६६.८% परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.” त्यात म्हटले आहे की कच्च्या तागाचा मंजूर केलेला किमान आधारभूत किमतीचा …

Read More »

धान-भरडधान्यासाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर …

Read More »

हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आव्हान,… शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी …

Read More »

सोयाबीनसाठी गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक हमीभाव खरेदी केंद्रही सुरु, संख्या आणखी वाढणार

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन …

Read More »

अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही

हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी …

Read More »

रविकांत तुपकर यांच्याबरोबरील बैठकीत अजित पवार यांनी दिले हे आश्वासन सोयाबीन, कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह केंद्र शासनाची अनुकुल भूमिका

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे …

Read More »

ग्रामीण भागात जास्तीत कारची विक्री होण्याची आशा फाडा संस्थेकडून शक्यता वक्य केली

सामान्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खरीपाची चांगली पेरणी तसेच नव्याने निवडून आलेल्या सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत केलेल्या वाढीमुळे ग्रामीण भारतातील खर्चाच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ऑटो रिटेल कामगिरी वाढेल, असे एका उद्योग संस्थेने शुक्रवारी सांगितले. सध्याच्या बाजार परिस्थितीच्या आधारावर, जुलै ऑटो रिटेल कामगिरीसाठी एकंदर रेटिंग सावधपणे मध्यम दृष्टिकोनासह …

Read More »

शासन दरापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही

तूर खरेदी साठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणा-यांवर कारवाई केल्या जाईल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. हंगाम …

Read More »