देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर बंदी घालत शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यासाठी मोठमोठाले बॅरिकेडस आणि टोकदार खिळे, आणि रस्त्यात भाल्यासारखे टोकदार खिळे बसविले. या सगळ्या पार्श्वभूमीवर शंभू सीमेवर पोलिस-निमलष्करी दलाच्या जवान आणि शेतकऱ्यांमध्ये झडप झाली. त्यामुळे दिल्लीत येणाऱ्या सीमा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
या सगळ्या घडामोंडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता छत्तीसगड राज्यातील सुरगुजा जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळ पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर झालेल्या जाहिर सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी चलो दिल्ली या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत म्हणाले की, जर केंद्रात पुन्हा एकदा आमचे काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत कायदेशीररित्या मिळवून देणार असल्याची गॅरंटी दिली.
कांग्रेस ने ऐतिहासिक प्रण लिया है —
हम स्वामीनाथन कमेटी की रिपोर्ट के मुताबिक़, किसानों को MSP क़ानून बनाकर उचित मूल्य की गारंटी देंगे।
इससे 15 करोड़ किसान परिवारों को फ़ायदा पहुँचेगा। #KisaanNYAYGuarantee
📍अंबिकापुर, छत्तीसगढ़ pic.twitter.com/weR0pNKkGK
— Mallikarjun Kharge (@kharge) February 13, 2024
यावेळी मल्लिकारजून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवित म्हणाले, सध्या देशात सगळीकडे नरेंद्र मोदी हे गॅरंटी देत फिरत सुटले आहेत. परंतु त्यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले.
तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने छत्तीसगड येथे आलो असून येथूनच शेतकऱ्यांच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाबाबत एक घोषणा मला करायला आवडेल असे सांगत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायदेशीर मार्गाने किमान आधारभूत किंमत मिळवून देण्याची मी गॅरंटी देतो. जर आगामी लोकसभा निवडणूकीत आमचा पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास इंडिया आघाडीची शेतकऱ्यांच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देण्याची आमची पहिली प्राथमिकता आणि पहिली गॅरंटी राहणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
कँटीले तार, ड्रोन से आँसू गैस, कीले और बंदूक़ें… सबका है इंतज़ाम,
तानाशाही मोदी सरकार ने किसानों की आवाज़ पर जो लगानी है लगाम !
याद है ना “आंदोलनजीवी” व “परजीवी” कहकर किया था बदनाम, और 750 किसानों की ली थी जान ?
10 सालों में मोदी सरकार ने देश के अन्नदाताओं से किए गए अपने… pic.twitter.com/9iUAzFeXgg
— Mallikarjun Kharge (@kharge) February 13, 2024