महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे सरकार कोसळणार की राहणार या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही गुरुवारी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली …
Read More »पवारांपाठोपाठ आता नाना पटोले यांची स्पष्टोक्ती,… जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा …
Read More »जयंत पाटील यांचे आवाहन, प्रागतिक पक्ष भाजपाच्या विरोधातच-मविआने विश्वासात घ्यावे शेकाप नेते भाई जयंत पाटील यांचे आवाहन
राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपासोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी काल येथे केले. राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद सभा काल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित …
Read More »पवारांच्या राजीनामा प्रकरणावर उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाविकास आघाडीला तडा जाईल… मी सल्ला देऊ शकत नाही
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. तसेच लोक माझे सांगाती या पुस्तकात मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांच्या कारभारावरून केलेल्या टीकेवर अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर आणि पुस्तकातील उल्लेखावरून …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, त्यांच्या पक्षांतर्गत बाब पण, शरद पवारांसारखे नेते… महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नसून पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पवारांनी घेतलेला निर्णय ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत बाब …
Read More »जयंत पाटील म्हणाले, मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा दाखवून देणारा ७५ बाजार समित्या मविआच्या ताब्यात
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी जयंत पाटील म्हणाले, गेल्या …
Read More »बीकेसीतील ‘वज्रमुठ’ सभेसाठी काँग्रेसच्या या ६ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र दिनी जंगी सभेसाठी सोपविली जबाबदारी
महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ …
Read More »शरद पवार यांचे पुन्हा संभ्रमातित वक्तव्य; २०२४ ला मविआ म्हणून लढण्याचा निर्णय….. राजकिय वर्तुळात तर्त-वितर्कांना उधाण
राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली
मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …
Read More »मुंबई महापालिकेबाबत घेतलेला शिंदे-फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय न्यायालयाने केला मान्य पालिकेच्या हद्दीत २२७ सच वार्ड
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईतील वार्ड संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस यांचे भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निर्णयात बदल करत मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येत केलेली वाढ पुन्हा रद्दबादल करत २३६ वरून २२७ इतकी करण्यात आली. या …
Read More »