Breaking News

Tag Archives: शिवसेना उबाठा

रामाच्या पूजेसाठी उद्धव ठाकरे यांचे थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

एकाबाजूला भारत विकासाच्या वाटेने चालल्याचे वक्तव्य करत सांसदीय कारभारातही हिंदूत्ववादी विचारसरणीला आणि प्रथांना प्राधान्य देत केवळ स्वतःच्या नावाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील नवे संसद भवन असेल, शहिद स्मारक किंवा राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा कार्यक्रम असेल अशा …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, विधानसभा अध्यक्षांचा निवाडा न्यायालयीन नव्हे तर….

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आलेल्या निकालानंतर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका,… ते पुन्हा अचानक कालावधी वाढवू शकतील…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्या निकालात न्यायालयाने स्पष्टपणे आदेश देत विहित कालावधीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. तरीही विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदत वाढ घेतली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या वेळखावू पध्दतीच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. मात्र उद्या १० जानेवारी …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या घरी ईडी, तर राजन विचारे यांच्याकडे आयकर विभाग

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाराष्ट्रातील जवळपास ४४ आमदारांनी एका फटक्यात पक्ष प्रमुखाला न विचारता आणि घटनात्मक ( शिवसेनेच्या नव्हे राज्यघटनेतील) तरतूदींना बाजूला सारत केंद्रातील महाशक्तीच्या (भाजपा-अमित शाह-नरेंद्र मोदी) च्या पाठिंच्या बळावर महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन करत जवळपास २ वर्षे झाले चालविलेही. या सगळ्या घडामोडीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यास …

Read More »

वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…

देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील …

Read More »

उद्धव ठाकरे यांची सूचना ,… याचा राजकिय इव्हेंट होऊ नये इतकेच

लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच भाजपाच्या रणनीतीनुसार आणि जाहिरनाम्यातील आश्वासनानुसार राम मंदिर उभारणीच्या कामाला युध्द पातळीवर सुरु आहे. त्यातच तसेच मुख्य राम मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकिय …

Read More »

संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…

तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल,… खरंच गुड गव्हर्नन्स तरी आहे का?

देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. परंतु या दिवसाचे औचित्य साधत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा गुड गव्हर्नन्स दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र याच दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी …

Read More »