Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

सुप्रिया सुळे यांचे आश्वासन,… सरसकट कर्जमाफी होईल भाजपाचं हे सरकार नसून दडपशाही

शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आज या मोर्चाचा तिसरा दिवस असून या मोर्चाने बारामती मतदार संघातील दौड येथून मोर्चात राष्ट्रवादी …

Read More »

अमोल कोल्हे यांचा टोला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर म्हणतात शेतकऱ्यांच सरकार पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे सर्वसामान्यांचे प्रश्न …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भाजपा हा महिला विरोधी पक्ष

महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज अनेक प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी शरद पवार गटाच्या खासदार तथा कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना …

Read More »

जयंत पाटील यांचा खोचक टोला, जसा “उडता पंजाब” तसा “उडता महाराष्ट्र”

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सरकारवर केली. आज हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर जयंत पाटील …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा टोला, …या निमित्ताने अघोषित आणीबाणी अनुभवली

कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, …प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा…

जवळपास मागील आठवड्यापासून संसद सुरक्षा प्रश्नी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या खासदारांकडून संसदेत सातत्याने चर्चेची मागणी करण्यात येत आहे. मात्र मागील तीन दिवसात राज्यसभा आणि लोकसभेतील मिळून १४१ खासदारांना प्रश्न विचारला म्हणून निलंबित करण्यात आले. त्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्राच्या विरोधात

भाजपाने आईस (इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडी) चा केलेला गैरवापर. जे भ्रष्ट आहेत, त्यांच्या पार्टीचे आहेत, ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या विरोधात केला नाही. तर जे भ्रष्ट नाहीत, त्यांच्या विरोधात करतात आणि त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवतात, हे आपण उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील सुडाचे राजकारण पाहत आहोत असा आरोप शरद पवार …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… अजित पवार यांना ती पदे देणे हे अनधिकृत होते का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती अनाधिकृत असल्याचं अजित पवार यांच्या वतीने बोलण्यात येत आहे. जर असं असेल तर उपमुख्यमंत्री पदापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत अजित पवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र जयंत पाटील यांनी दिले होते. तर हे देखील अनधिकृत होते का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस …

Read More »

संसद अधिवेशन सुरु होताच सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना नव्याने पीककर्ज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज लोकसभेत केली. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने …

Read More »

अजित पवारांवर अनिल देशमुख यांचा पलटवार, पाच तास माझ्या घरी….

कर्जत येथील मंथन शिबीरात पक्ष कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यासमोर अजित पवार यांनी बाजू मांडताना भाजपासोबत जाण्याच्या सर्व बैठकांना अनिल देशमुख हे उपस्थित होते. मात्र मंत्रिमंडळात मंत्री पद मिळणार नाही असे सांगताच अनिल देशमुख यांनी मंत्री पद नाही तर मी तुमच्यासोबत नाही असे जाहिर करत आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट अजित …

Read More »