मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूवरून आता खऱ्या अर्थाने राजकारण सुरु झाले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. मात्र या दौऱ्यात सरकारकडून राहीलेली माहिती या विरोधी पक्षनेत्यांकडून उघडकीस येत असल्याने अखेर या …
Read More »म्हाडाचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी होणार गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्रात म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागातील उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच २ महिन्यात या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यास आदेश दिले आहेत. साधारणत: २० ते २५ वर्षापूर्वी अर्थात १९९३ साली राज्यात शिवसेना-भाजपा …
Read More »पगाराला पैसे नाहीत मात्र न्यायाधीश-कुटुंबियांच्या चष्म्यासाठी सरकारकडे पैसे विधी व न्याय विभागाकडून प्रस्ताव मंजूर
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रसारामुळे अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची पाळी राज्य सरकारवर आली. त्यामुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी पैश्याची चणचण भासत असल्याने दर महिन्याला कर्ज काढत आहे. मात्र राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या चष्म्यासाठी तब्बल ५० हजार रूपये देण्याचा निर्णय …
Read More »१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …
Read More »घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर घरात २ फुटाचा तर सार्वजनिक मंडळासाठी ४ फुटाची गणेश मुर्ती बंधनकारक
मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे… १) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक. २) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि …
Read More »…तर प्रतिनियुक्त्या वाढवल्यास प्रशासनात असंतोष माजेल मंत्रालय अधिकारी संघटनेचा वाढीव नियुक्त्यास विरोध
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनातील अनेक विभागात सध्या महसूल विभागातील १५ टक्के अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात येते. मात्र आता या १५ टक्के संख्येतच वाढ करण्याचा प्रस्ताव काही मंत्र्यांकडून जाणिवपूर्वक आणण्यात येत असल्याने हा प्रस्ताव मान्य केल्यास इतर विभागात सरळ भरतीत नोकरीवर लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होवून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण …
Read More »वैद्यकिय शिक्षण मंत्र्याचा ३८ हजार चाचण्यांचा दावा आरोग्य विभागाने ठरविला खोटा कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे सरकारच्याच प्रसिध्दी पत्रकातच उघडकीस
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यासाठी राज्यात १०० प्रयोगशाळांची स्थापना केली. या प्रयोगशाळांमुळे राज्यात प्रतिदिन ३८ हजार चाचण्या होत असल्याचा दावा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. परंतु प्रत्यक्षात १० लाखांमागे ७७१५ कोरोनाचाचण्या होत …
Read More »सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता बंद ? लॉकडाऊन शिथिलीकरणानंतरही महसूल जमा रकमेत वाढ नसल्याने सरकारचा विचार
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आली नसल्याची स्पष्टोक्ती देवून २४ तासाचा अवधी उलटत नाही. तोच ७ व्या वेतन आयोगानुसार द्यायच्या २ऱ्या टप्प्यातील हप्ता एक वर्षानंतर देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानंतर आता यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पगारवाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता काही …
Read More »१२ वी निकाल १५ जुलै पर्यत , तर १० वीचा जुलै अखेरपर्यत जाहीर होणार बोर्ड अध्यक्षा काळे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरु झाल्यानंतर आता १० आणि १२ वी चा निकाल कधी जाहीर होणार याबाबत वेगवेगळ्या तारख्या परसविण्याचे पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शंखुतला काळे यांनी १० वीचा निकाल जुलै अखेर पर्यंत तर १२ वीचा निकाल १५ जुलै …
Read More »