Breaking News

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक रिपोर्ट नुसार भारतात घटस्फोटाचा टक्का किती ? 'ही' आहेत भारतीय घटस्फोटासाठी प्रमुख कारण

भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र भारतात तयार झाल्याचे दिसून आले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल सामान्य झाले असून मात्र, आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा टक्का कमी आहे.

आजही भारतात अनेक लोक लग्नाला साता जन्माचे नाते मानतात. भारतात घटस्फोटाचे प्रमाण वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक रिपोर्ट प्रमाणे अंदाजे १ % आहे, जे संपूर्ण जगात सर्वात कमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जगभरात सर्वाधिक घटस्फोटाची मागणी ही महिला करतात, मात्र भारतात चित्र उलटे आहे. भारतात सर्वाधिक घटस्फोटाची मागणी पुरुषांकडून केली जाते.

मग चला जाणून घेऊया भारतात घटस्फोटाची प्रमुख कारण कोणती ?

मानसिक वर्तन

लग्नानंतरची मानसिक वर्तणूक खूप महत्त्वाची असते. पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराबाबत खूप सकारात्मक असतात असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. दिवसभर ते त्याच्यावर संशय घेतात. त्यांच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. ते ऑफिसमध्ये असोत किंवा बॉससोबत असोत, त्यांच्या जोडीदाराला सर्व काही माहित असणे आवश्यक असते. त्यामुळे दोघांमधील विश्वासच नातं संपुष्ठात येऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते.

धार्मिक मतभेद

आजकाल इतर धर्मात विवाह केल्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकवेळा असे दिसून आले आहे की दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर जोडीदारावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जातो किंवा एकमेकांच्या धर्माबाबत नेहमीच वाद होतात. त्यामुळे भविष्यात एकत्र राहणे कठीण होऊन शेवटी नातं तोडण्यापलीकडे दोन्ही जोडप्याकडे कोणताही मार्ग नसतो.

स्वतःच्या जोडीदाराबद्दल आदर

आपण एखाद्याशी लग्न केलं तरी तुमचा आत्मसन्मान विसरू नका. आत्मसन्मान हा कोणत्याही व्यक्तीचा आत्मा असतो. भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे हे सत्य आहे. त्यामुळे कुठेतरी स्त्रीने आपण सांगू तसंच वागावं असा हट्ट नवऱ्याकडून होऊ शकतो. पण गोष्टी हद्द पार करून केल्या तर गोष्टी थेट घटस्फोटापर्यंत पोहचते.

जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध

नातेसंबंध आणि लग्नानंतर अनेकदा लोकांची फसवणूक होते तेव्हा खूप वाईट वाटते. घटस्फोटाची अनेक प्रकरणे आहेत ज्यात पती/पत्नीपैकी एका जोडीदाराने फसवणूक केल्यानंतर घटस्फोटाची मागणी जोर धरते. आजकाल विवाह बाह्य संबंधामुळे घटस्फोटाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही जोडीदाराप्रती प्रामाणिकता आणि आदर राखणे गरजेचे आहे.

 

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *