Breaking News

शिंदे गटाला टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, टेंम्पो-ट्रक कमी पडले पाहिजेत… निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शपथपत्र आणि सदस्य पत्र वाढविण्याचे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे काम पुन्हा एकदा हाती घेत नव्याने पक्ष उभारणीच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक समर्थकाला जास्तीत जास्त सदस्य झाल्याचे नवे पत्र आणि शपथ पत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या वाहतूक शाखेकडून नवीन सदस्य …

Read More »

एकनाथ शिंदेही बनतायत इव्हेंट मुख्यमंत्री, आता शिक्षकांशी साधणार संवादअ शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद, समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

देशात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात मागे नसलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्या तरी कोणत्याही राजकिय पक्षाकडून धरला जात नाही. मात्र महाराष्ट्रातही कोणत्याही गोष्टीचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही सण-उत्सव असो किंवा जयंती उस्तव असो किंवा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा पोलिस महासंचालकांना दिले आदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख आणि शालनजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले असून …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका; रबर स्टँप मुख्यमंत्री… असंवेदनशील सत्ताधाऱ्यामुळे शेतकऱ्याना आत्महत्या करावी लागतेय

एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु, असे आश्वासन देत आहेत, त्याच वेळी दिवसाला दररोज सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यात राज्यात सुमारे १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजून किती आत्महत्या झाल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवेल असा संतप्त सवाल विधान …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा टोला, कधीही टीव्ही लावला की मुख्यमंत्री कोणाच्या तरी घरी… घरगुती दर्शनावरून लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दही हंडीसह सर्व सणांवरील निर्बंध पूर्णत: काढून टाकले. दही हंडीच्या दिवशी मुंबई ठाण्यातील भाजपा आणि शिंदे गटाच्या जवळपास सर्वच दही हंडी मंडळांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. त्या पाठोपाठ गणेशोस्तवाचा सण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या टीकेला गोपीचंद पडळकर यांचे प्रत्युत्तर, …हेच त्याचं मोठं दुखणं शरद पवार हेच काही तरी करू शकतात असे त्यांना वाटतं

राज्यात गणेशोस्तवाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज भाजपा आणि शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या घरी जावून गणपतीचे दर्शन घेत आहेत. त्यातच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरीही गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घरगुती दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ …

Read More »

आशिष शेलार यांची टीका, पब पेग आणि पार्टीवाल्या पेग्वीन सेनेला ध्वनी प्रदुषणाची सवय मुंबईतून गुजरातला सगळं हलवलं जातय टीकेवरून साधला निशाणा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर झालेल्या भाजपाच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात गतवेळी पेक्षा यावर्षी मुंबई महापालिकेत जास्त जागा निवडूण आणायच्या आणि भाजपाचा भगवा फडकाविण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहिर केले. त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये भाजपाकडून विशेषत: आशिष …

Read More »

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच कार अपघातात निधन पालघर मध्ये त्यांच्या कारला झाला अपघात

टाटा सन्सचे माजी प्रमुख तथा सर्वात तरूण उद्योजक म्हणून प्रसिध्द असलेले सायरस मिस्त्री यांचे आज कार अपघातात निधन झालं. हा अपघात पालघर येथील चारोटी येथे झाला. रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची कार धडकून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साधारणत: दुपारी सव्वातीन वाजता त्यांच्या कारचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत …

Read More »

राहुल गांधी यांचे मोदींना खुले आव्हान, ५५ तास नाहीतर ५ वर्षे ईडीत बसवलंत तरी… रामलीला मैदानावरून राहुल गांधीने फुंकले रणशिंग

कोरोना नंतरच्या काळात देशातील सातत्याने वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेली जीएसटी आणि वाढती बेरोजगारी आदी प्रश्नावरून आज नवी दिल्लीतील रामलीला मैगानावर मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून हल्लाबोल रॅली काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या ईडी चौकशीवरून आव्हान दिले. पंतप्रधान मोदी …

Read More »

भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर, कोण तो रामदास कदम? कृतघ्न माणूस… राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करणे आता जवळपास बंद केले असून त्यांना अनुल्लेखाने मारण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर …

Read More »