Breaking News

किसान सभेचे २३वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत

अखिल भारतीय किसान सभेचे २३वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोले, जि. अहमदनगर येथे आयोजित केले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी भव्य जाहीर सभेने होणार असून ओल्या दुष्काळ प्रश्नी राज्यव्यापी आरपार लढ्याचे नियोजन अकोले अधिवेशनात करण्यात येणार आहे. राज्य अधिवेशनापूर्वी किसान …

Read More »

तीन महिन्यात महाविकास आघाडीचे ‘हे’ निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीबीआयला राज्यातील घडामोडींचा तपास आणि एफआयआर नोंदवण्यास महाविकास आघाडी सरकारने नाकारलेली परवानगी पुन्हा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारच्या किमान अर्धा डझन निर्णयांना स्थगिती दिली आहे किंवा ते रद्द केले आहेत. नवीन सरकार सत्तेवर येताच आधीच्या सरकारचे निर्णय …

Read More »

शरद पवारांनी केली पोलखोल, वसूलीला कोणी जात नसल्याने ती कर्जमाफी पुरंदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भू-विकास बँकेच्या कर्जदारांचे ९६४ कोटी रूपयांचे कर्ज माफ करत असल्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाची पोलखोल करत …

Read More »

राज्यपाल विरूध्द केरळ सरकार वादात न्यायालयाचा विजयन सरकारला दिलासा

पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात राज्यपालांच्या मदतीने भाजपाकडून खेळण्यात येत असलेल्या राजकारणाने आता केरळ राज्यातही प्रवेश केला आहे. केरळातील डाव्यांचे सरकार असलेल्या पिनराई विजयन सरकारने नियुक्ती केलेल्या ९ विद्यापीठांच्या कुलगुरुंना आज सकाळी ११.३० वाजेपर्यत राजीनामा देण्याचे आदेश राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी दिले. मात्र त्या विरोधात कुलुगुरूंनी राज्यपालांच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात …

Read More »

शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिलीच दिवाळी होत आहे. यापार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या वेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच जाहिर केला. शंभूराज …

Read More »

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही ही एक सामना खेळलो…

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात न्यायालयीन संघर्ष पाह्यला मिळाला. त्यापाठोपाठ ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनची लढाई ही न्यायालयात पोहोचली. मात्र न्यायालयाने शिंदे गटालाही परवानगी दिली. त्यानुसार ठाण्यात एकाबाजूला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे …

Read More »

अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी …

Read More »

अरविंद सावंत यांचा शिंदेंवर निशाणा, ते मैदानात राहुन लढले उगाच तुलना करू नका औरंगाबाद दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर टीका करणाऱ्याना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंवर पलटवार

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा करत तेथील शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची मदत करा अशी मागणीही त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजपाबरोबर शिंदे गटाकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यातच आज …

Read More »

रामदास कदम यांची टीका, उध्दव ठाकरे फक्त दिखाव्यासाठी गेले… औरंगाबादच्या दौऱ्यावरूनव साधला निशाणा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाती आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी करत त्यांची कैफियत जाणून …

Read More »