Breaking News

Tag Archives: rajesh tope

महाराष्ट्र कोरोनाबरोबरची लढाई जिंकतोय चिमुकल्यापासून ते आजीबाईंसह २९५ रूग्णांनी केली मात

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच याच कोरोनाग्रस्तांकडून या विषाणूवर मात करण्यात येत असून महाराष्ट्राचा कणखरपणा दाखवित २९५ जणांनी आजारातून बरे होवून दाखविले आहे. मुंबई महानगरातील २०६ जणांसह ८९ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले …

Read More »

सोलापूरात आणखी १० कोरोनाबाधीत रूग्ण जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणू ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नव्हता. मात्र मागील काही दिवसात एक रूग्ण सापडला त्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर काहीजणांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाला. मात्र आज १० कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यापूर्वीचा रूग्ण …

Read More »

कोरोनाने एमएमआरमध्ये दोन हजार तर राज्यात २६०० ची संख्या ओलांडली सलग दुसऱ्यादिवशी मुंबईसह राज्यात ३५० जणांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येत सातत्याने वाढ होत असून काल ३५० रूग्णांचे निदान झाले. तितकेच रूग्ण आजही पुन्हा सापडले आहेत. एकट्या मुंबई शहरात १७५६ वर रूग्ण संख्या पोहोचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात २४४ संख्या असे मिळून मुंबई महानगर प्रदेशाने २ हजाराचा आखडा पार केला असून राज्याची संख्या २ हजार …

Read More »

राज्यातील संख्या २३३४ वर तर नव्या ३५२ रूग्णांचे निदान मृतकांच्या संख्येत ११ ने वाढ

आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या २३३४  झाली आहे. तर राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूंबद्दल अधिकची माहिती – आज झालेल्या मृत्यूंपैकी  ४ …

Read More »

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »

मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची …

Read More »

मोठ्या शहरांमध्ये मोबाईल तर तालुकास्तरावर रक्षक क्लिनिक महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा निर्वाळा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी रूग्णालयांनी आणि डॉक्टरांनी स्वत:ची क्लिनिक बंद केल्याने राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या इतर आरोग्याच्या तक्रारीवर इजाल होईनासा झाला. त्यामुळे ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) तालुकास्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक सुरू आणि मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करणाचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

कोरोना (तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाला) ने गुणाकार सुरु केलाय…दक्ष रहा तीन पध्दतीच्या रूग्णालयांची स्थापना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडून चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. रोजचे कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंताजनक असून या आजाराने आता गुणाकार पध्दतीने अर्थात तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाल्याचा इशारा देत दक्ष रहा, सतत मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत चीनच्या वुहान प्रांतातील सर्व निर्बध ७०-७६ दिवसानंतर उठविण्यात …

Read More »

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश ? राज्याने हजाराचा टप्पा ओलांडला रूग्ण १०१८ वर पोहोचले, सर्वाधिक पुन्हा मुंबईत

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली. राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, …

Read More »