राज्यात ड्रग्ज व्यापार आणि बनावट नोटांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबधाबाबत आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका व्हिडिओचा फायनान्सर हा ड्रग्ज पेडलर असल्याचा आरोप केला होता. त्यावर दिवाळी झाल्यावर मलिकांचा बॉम्बगोळा फोडू असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते …
Read More »सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले
मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर …
Read More »सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल
मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …
Read More »प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरे सरकारवर घणाघात
मराठी ई-बातम्या टीम १०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा अशा अनेक प्रश्नांपासून पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, पॅनेलिस्ट नितीन …
Read More »नाना पटोले म्हणाले, १० मार्चनंतर सरकार आणि पक्षाच्या कामकाजात बदल महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत
मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »संजय राऊतांच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले की, आता लवकरच ते… ईडीने तक्रार केली नाही तर आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होवू शकते
मराठी ई-बातम्या टीम काल दोन दिवसांपासून राज्यात उस्तुकतेचा विषय ठरलेली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्या यांची कंपनी आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्या झालेल्या व्यवहाराची माहिती आणि महाआयटीत झालेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती उघडकीस आणली. त्यावर काँग्रेसचे …
Read More »जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते मात्र… राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केला सवाल
मराठी ई-बातम्या टीम या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच ‘त्या’ लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय, पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. …
Read More »राष्ट्रवादीने केलेल्या जखमेचे काँग्रेसने उट्टे काढले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी मालेगांवमधील काँग्रेसच्या २३ हून अधिक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या डिवचण्याने काँग्रेस चांगलीच दुखावली होती. मात्र त्याचेच उट्टे काढत परभणीतील सेलू येथील राष्ट्रवादीच्या २४ नगरसेवकांसह, जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे …
Read More »चंद्रकांत पाटलांचे पुन्हा भाकित, मविआला १० मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ आघाडीच्या मंत्र्यांची तुरुंगाच्या दिशेने वाटचाल
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत मंत्री मलिक यांची महत्वापूर्ण माहिती नागपूरात अधिवेशन होणे अशक्य
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून एकही पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घेण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित असल्याची घोषणा पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर केली. मात्र या महिन्याच्या अखेरपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »