Breaking News

Tag Archives: chief minister

अखेर राज्य सरकारला सुचले शहाणपण, तोंडदेखली का होईना केली समिती स्थापन वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास शिंदे-फ़डणवीस सरकारला नऊ महिन्याचा कालावधी होत आला आहे. या नऊ महिन्यात कधी नैसर्गिक तर कधी अपघाताने निष्पाप जिवाचे बळी गेले. परंतु या प्रत्येक घटनेत संबधित व्यक्ती आणि तेथील परिस्थिती जबाबदार होती. तरीही कार्यकर्त्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत तर जखमींवर शासकिय …

Read More »

अजित पवार यांची मागणी, सत्य येणे आवश्यक; निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश द्या राज्यपाल रमेश बैस यांना पत्र ;सरकारचे प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्या...

खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी अजित पवार यांनी पत्रात म्हटले की, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ …

Read More »

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन शहर “विकासा”वर छाप सोडावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगरविकास दिन साजरा

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील महापालिका आयुक्त, …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले अन्य महत्वाचे निर्णयः महिला, जात प्रमाणपत्र, साखर कारखाना… आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवत सर्वांना खुश करण्याचे निर्णय

एकाबाजूला अस्थिर राजकिय वातावरण आणि दुसऱ्याबाजूला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या पार्श्वभूमीवर सर्व वर्गातील नागरीकांना खुष करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यास सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्या पक्षातील सहकार (स्वंयघोषित) महर्षींना कायद्याने एकाबाजूला सहकारी संस्थांच्या थकबाकी प्रकरणातून पळवाट काढून देत असतानाच दुसऱ्याबाजूला अडचणीत असलेल्या …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या १७ मे २०२२ च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट – ड ते गट – अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, त्या दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकार काय लपवतंय ? राज्यपालांना पत्र, खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, लोकप्रतिनिधी नसताना ४८ टक्के जास्तीच्या दराने निविदा.. फक्त पाचच कंत्राटदारांना निविदांचे वाटप, निविदेत अनेक नियमांचा समावेश नाही

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जवळपास ४०० किमीचे रस्ते सिमेंटचे बनविणार असल्याची घोषणा करत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे जाहिर केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे …

Read More »

टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून …

Read More »