Breaking News

Tag Archives: आचारसंहिता

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …

Read More »

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन …

Read More »

आचारसंहिता लागू होऊनही राजकिय पक्षांचे उमेदवार ठरेना? मतदारांचा वेगळाच प्रश्न

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर करत लागूही केली. मात्र महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूकीला जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने फक्त ४८ जागांपैकी …

Read More »

लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या भीतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ३३ मोठे निर्णय

लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते या भितीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभाग आणि राज्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेतले. तर राज्य सरकारकडून …

Read More »