Breaking News

राजकारण

लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल फडणवीसांनी महाराष्ट्रात राबवले रश्मी शुक्ला या तर फक्त प्यादं, त्यांना आदेश देणा-या मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला पाहिजेः अतुल लोंढे

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे …

Read More »

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपा नेते गप्प कसे? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा …

Read More »

उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …

Read More »

मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रभाव घटला ? अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्राचे चार मंत्री पोलंड-युक्रेन सीमेवरील घटनेनंतर मोदी सरकारचा निर्णय

मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य

मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “होय, आमचीही मुले इंग्रजीत शिकली पण घरात…” स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेमुळे माझी मुले मराठीत बोलू लागली

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आयोजित सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असताना आमच्यावर टीका झाली की बाळासाहेब मराठी मराठी करतात आणि त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. होय माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. परंतु त्यावेळी मला बाळासाहेबांनी बोलावून सांगितले …

Read More »

राहुल गांधी स्वपक्षियांवर कडाडले, काम करायचे नसेल तर खुशाल भाजपात जा गुजरातमधील चिंतन शिबीरात सोडले टीकास्त्र

२०१४ सालापासून काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे. तसेच अनेक राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून निसटून जात आहेत. मात्र मागील काही काळापासून राहुल गांधी यांच्याकडून मांडण्यात येत असलेल्या भूमिकेचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची चांगलीच अडचण होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांचीही चौकशी करा राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य

फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात वेगळंच वातावरण…पटत नाही… रायगड येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

मागील दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नुकतेच महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या घरावर छापे मारण्यात येत आहेत. तसेच या छापेममारीवरून रोज सत्ताधारी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात राज्यातील वातावरण बदलल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात …

Read More »

चंद्रकांत पाटील, नारायण राणे, नितेश राणेंवर तात्काळ फौजदारी कारवाई करा दिशा सालियन प्रकरणी राज्य महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

दिवगंत दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सातत्याने चुकीचे आणि जाणिवपूर्वक वक्तव्य करून बदनामी करत असल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तात्काळ फौजदारी करावाई करून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना दिले. …

Read More »