Breaking News

Editor

मिळालेल्या धमकीवरून एकनाथ शिंदे म्हणाले, या धमक्यांचा माझ्यावर परिणाम… मी जनतेतला माणूस मला कोणीही रोखू शकणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या धमकी नाट्यामागे नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदे म्हणाले, …

Read More »

शिंदे गटाच्या खासदारापाठोपाठ आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे ठाकरेंचा माणूस कागदोपत्री सिध्द झाले आहे

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की, ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते. ते बुलढाण्यातील शिंदे गटाच्यावतीने आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी …

Read More »

‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले भाजपाच्या टीकेचा ‘भारत जोडो’ यात्रेवर काहीही फरक पडत नाही

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे. परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत …

Read More »

बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा …

Read More »

पॅनकार्ड क्लब कंपनीत पैसे अडकलेल्यांसाठी खुशखबर: पैसे कसे परत मिळवायचे, वाचा राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने दिला पैसे परत देण्याचा निकाल

गुंतवणूकदारांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांना आपले पैसे कसे मिळणार याबाबतची चिंता सतावत होती. अखेर याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने घेतलेल्या सुनावणीत सदर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आदेश ९ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. सदरचे पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, राज्यातील ‘या’ पोलिसांना दिडपट वेतन

राज्यातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत दिली. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रशासन नेमकं कोण चालविते ते देवालाच ज्ञात ओरबाडून सत्तेवर आलेलं सरकार

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येवून जवळपास तीन महिने झाले. मात्र या सरकारच्या कारभारावरून सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने कधी राज्य सरकारच्या पालकमंत्री नियुक्तीवरून तर कधी राज्याच्या कारभारावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत असतात. सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे …

Read More »

शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर मिलिंद नार्वेकर यांनीच ट्विट करत दिली ‘ही’ माहिती मी भाग्यवान कारण मला गरूड वहनाच्या पुजेला सहभागी होता आलं

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे यांचे खास दूत म्हणून मिलिंद नार्वेकर हे सूरतला गेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक सक्रिय घटनांपासून मिलिंद नार्वेकर हे लांब राहिले असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. तसेच मातोश्रीवरही मिलिंद नार्वेकर दिसेनासे झालेले आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव …

Read More »

अरविंद सावंत यांची शिंदे गटाला कचरा बेईमान विशेषण…

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जास्त आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केल्यापासून समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या …

Read More »