मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिले हे आश्वासन १० राज्यातील कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक
मुंबई: प्रतिनिधी देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे सांगत राज्यात दुसरी …
Read More »पंतप्रधान किसान योजनेतही बोगस शेतकरी एका सुजाण मुंबईकरांमुळे यावर प्रकाशझोत
मुंबई: राजू झनके तेलंगना राज्याच्या धर्तीवर देशातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यासाठी वर्षाला ६ हजार रूपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होवू नये यासाठी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्याची घोषणा केली. मात्र पंतप्रधान किसान सन्मान निधई योजनेतील …
Read More »लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी निसर्ग वादळ आणि ५ ऑगस्टच्या पावसामुळे १५६५ कोटीहून अधिकचे नुकसान
मुंबई : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने आणि ५ ऑगस्टरोजी झालेल्या पावसामुळे राज्यात १ हजार ०६५ कोटी आणि ५०० कोटी असे मिळून १५६५ कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. देशात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर …
Read More »अंदमान व निकोबार बेटांवर दूरसंचार सेवा गतिमान करण्यात या मराठी भूमीपुत्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प युनिव्हर्सल …
Read More »राज्यातल्या पावसाची पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंकडून माहिती मुंबई, कोकण आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांशी थेट मुख्यमंत्री संपर्कात
मुंबई : प्रतिनिधी मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल …
Read More »शिवसेनेने दिले एक कोटी मात्र राम मंदीराचे अध्यक्ष म्हणतात देणगी मिळाली नाही राम मंदीर उभारण्याआधीच न्यासाकडून कोट्यावधींच्या अफरातफरीला सुरुवात ?
मुंबई : प्रतिनिधी अनेक हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदीराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी १ कोटी रूपयांची देणगी शिवसेनेच्यावतीने राम मंदीर न्यासास बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली. मात्र न्यासाचे अध्यक्ष गोपालदास अशी देणगी दिली नसल्याचे सांगत असल्याने हा पैसा गेला कुठे असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह व्टिटरवरून दिली माहिती, रूग्णालयात भर्ती होणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते लवकरच भर्ती होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरवरून दिली. दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात येत …
Read More »काय आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण? धोरणातील प्रमुख मुद्दे आणि त्याबाबतच्या काही
तब्बल ३४ वर्षानंतर देशाचे शैक्षणिक धोरण नव्याने तयार करून त्यास नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली. राज्यघटनेच्या सामायिक सूचीमध्ये शिक्षण हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दोघांच्या अखत्यारीत येतो. या त्यामुळे या धोरणास केंद्र सरकारने जरी मान्यता दिलेली असली तरी त्याची अंमलबजावणी केंद्राबरोबरच राज्य सरकारावर राहणार आहे. विशेष म्हणजे हे …
Read More »नरेंद्र मोदींविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल दिला म्हणून या अधिकाऱ्याची उचलबांगडी बलदेव सिंह यांच्या विरोधातील चौकशी अद्याप अपूर्ण का? याचे उत्तर फडणविसांनी द्यावे
मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. …
Read More »