मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने राज्यातील जनता निर्बंधात रहात आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात मास्क मुक्ती आणि निर्बंध मुक्तीचा निर्णय होणार का याबाबत राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहीलेले असताना या विषयी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान करत …
Read More »शासकीय सेवेतील भरती टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल मार्फत होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांचे उत्तर
राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »आरोग्य मंत्र्यांची ग्वाही, नव्या रूग्णवाहिका देणार, तर हजार गाड्यांचे फ्लिट बदलणार वाहन चालकांचे वेतन लवकरच देणार – टोपे
राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत पगार लवकरच मिळणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे पद सोडल्यास इतर कर्मचारी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात. रुग्णवाहिकेचे चालक म्हणून कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद केली असून …
Read More »बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी १८ तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई शहरामध्ये बोगस पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची …
Read More »जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार
नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. मोठ्या महानगरपालिकेमध्ये शव वाहिका उपलब्ध आहेत. नगरपालिकामध्ये शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी नगरविकास विभागाला विनंती करु, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »राज्यातील कोरोना लाटेसंदर्भात आणि मास्कमुक्तीबाबत आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… घाईगडबडीत निर्णय घेणे अडचणीचे
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्येत चांगलीच घट आली आहे. तसेच मृतकांच्या संख्याही नियंत्रित राहीलेली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. पण तिसरी लाट संपली हे माझं वैयक्तिक असल्याचा खुलासा करायला विसरले …
Read More »आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे म्हणाले, …तर चौथ्या लाटेचा धोका नाही मार्च एप्रिलमध्ये निर्बंधमुक्त होण्याची शक्यता
जवळपास महिनाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मार्च नाही तर एप्रिल महिन्यात राज्यात निर्बंधमुक्त होण्याची शक्यता असून राज्यातील कोरोनाच्या चवथ्या लाटेचा सामना करायचा असेल तर सर्वांचेच लसीकरण व्हायला हवे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, कौतुकाने त्यांच्या पोटात मळमळ होते, पण अधिकाऱ्यांनी त्या… विरोधकांबरोबर प्रशासनालाही दिल्या कानपिचक्या
मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून कौतुक करतात. पण काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर करत एखादं पद, अधिकार लाभला की मी बरा, माझे कार्यालये बरे असं न समजता …
Read More »शाळा सुरु होणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण विधान आणखी १०-१५ दिवस बंदच राहणार
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात वाढत असलेली कोरोना आणि ओमायक्रॉनच्या मागील काही दिवसांपासून वाढ होत होती. मात्र आता संख्येत घट येवू लागली असून मुंबईसह राज्यात रूग्णसंख्याही स्थिर होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून अद्याप तरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यासंदर्भात …
Read More »केंद्रीय मंत्र्यांबरोबरील बैठकीनंतर मंत्री टोपे म्हणाले, पॉझिटीव्हीटी दर जास्त पण… सर्वांसाठी विलगीकरणाचा कालावधी एकच
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन तास केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याबरोबर झालेल्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती देताना म्हणाले की, काही राज्यांमध्ये गृह विलगीकरणाचा कालावधी वेगवेगळा होता. त्यामुळे आता सर्व राज्यात एकच विलगीकरणाचा कालावधी राहणार असून तो सात …
Read More »