Breaking News

Tag Archives: girish mahajan

पालकमंत्री आणि आमदार दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि जनावरांच्या चाऱ्या देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. मात्र आचारसंहिता असल्याने त्यात अडचण येत आहे. यासंदर्भात आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असून त्याबाबतचा निर्णय येईल. तत्पुर्वीच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री चारा छावण्या, पाण्याची परिस्थिती याचा आढावा घेतील अशी माहीती …

Read More »

बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही

अभिनेता आमिर खान यांचे मत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार …

Read More »

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …

Read More »

अहो राम कदम तुमचा नंबर त्या वाघिणीने घेतला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी घेतला वनमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीची हत्येच्या मुद्यावरून चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार राम कदम बोलायला लागले. त्यावेळी त्यांना तालिकाअध्यक्षांनी बसायला सांगितले. मात्र ते तसेच बोलायला लागल्याने बोलण्यास उभे असलेल्या आमदार जयंतराव पाटील यांनी यांना खाली बसवा यांचं कौतुक उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि केले आहे. त्यामुळे यांना खाली …

Read More »

आदीवासींच्या वनजमिनींची प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची प्रतिभा शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासींच्या जमिनीच्या प्रश्नी आठ महिन्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा याप्रश्नी मोर्चा काढल्यानंतर प्रलंबित राहीलेल्या जमिनीचे दावे पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आदीवासी शेतकरी मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांनी दिली. आदीवासींच्या जमिनीच्या संदर्भात आठ महिन्यापूर्वी विधानभवनावर …

Read More »

मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी गाठी-भेटी मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, महाजन यांच्याशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील …

Read More »

भूजल अधिसूचना राज्यातील शेतकऱ्यांना संकटात नेणारी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, …

Read More »

काँग्रेसला “हात” दाखवित राजेंद्र गावितांनी गळ्यात घातली “कमळ” ची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदीयाच्या रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यात राजकिय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. यातील पालघर येथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपला उमेदवार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शोधाशोध सुरु असतानाच काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. तर गावीत यांनीही काँग्रेसमध्येच …

Read More »

डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर  प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …

Read More »

राज्याला मोतीबिंदू मुक्त करणार वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन

जळगाव : प्रतिनिधी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्याच टप्प्यात १ हजार ३१७ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या शिबिरांमधील हा एक नवीन उच्चांक असून या अभियानाअंतर्गत दरवर्षी सात लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साकार करणार …

Read More »