मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबरोबरच राज्यातील एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुढे येवून काम केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेतन वेळेवर देणे शक्य होत नाही. मात्र जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मराठी e-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना …
Read More »कोरोना: ७ दिवसात १ हजाराने वाढत मृतकांची संख्या ९ हजार २६ वर ३५२२ जण बरे होवून घरी, ५३६८ नवे बाधित रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी राज्यात २४ तासात २०४ जणांच्या मृत्यूसह एकूण मृतकांची संख्या ९ हजार २६ वर पोहोचली. १५ जून रोजी नोंदीत राहीलेले १५०० च्या आसपास मृतकांची संख्या समाविष्ट केल्यानंतर मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढीस सुरुवात झाली. १५ ते ३० जून महिना अखेर मृतकांची संख्या ७म हजार ८५३ वर पोहोचली. तर १ …
Read More »भाजपा खा. राणे म्हणाले, निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मातोश्रीपुरतेच मर्यादीत कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी महाविकासआघाडी सरकारला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणास आणण्यात सपशेल अपयश आले असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निष्क्रियताच याला कारणीभूत आहे. निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम नसुन ते फक्त मातोश्री पुरतेच मर्यादित असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबई येथे केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत …
Read More »आता देवस्थाने व मंदिरे उघडा भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन मध्ये बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी आज भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात की, राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत बाजारपेठ काही निर्बंधांसह पुन्हा हळू हळू सुरू होत आहेत. त्याचबरोबर राज्यात …
Read More »कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके …
Read More »पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …
Read More »मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा
मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …
Read More »कोरोनाबाधितांवरील उपचार, आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती सीसीटीव्ही बसविण्याचे आणि नातलगांना रुग्णांच्या चौकशीसाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. …
Read More »कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली …
Read More »पतंजलीने दिशाभूल केल्यास कडक कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई: प्रतिनिधी पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन …
Read More »