Breaking News

Tag Archives: congress

काँग्रेसच्या आघाडीत मनसे? राज ठाकरे यांच्या भेटीला काँग्रेसचे माणिकराव ठाकरे

मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपप्रणित आघाडीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला थेट आघाडीत सहभागी न करता स्वतंत्र प्रचार करण्यास भाग पाडले. तरीही भाजपचा किमान राज्यात पराभव करता आला नाही. त्यामुळे अखेर आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी …

Read More »

विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …

Read More »

लोकांचा निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी आज जो निकाल आलाय त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. महाआघाडीने जो प्रयत्न केला त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार… कार्यकर्त्यांना धन्यवाद… आणि लोकांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

Read More »

जनतेचा कौल मान्य! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले …

Read More »

शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा “नशीबवान विजय” अत्यंत कमी खर्चात मिळविले निवडणूकीत यश

हातकणंगलेः प्रतिनिधी निवडणूका म्हटल्या की विजय मिळविण्यासाठी वारे-माप खर्च करणे आले. मग तो कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर पध्दतीने खर्च करण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाचा उमेदवार मागे पुढे पहात नाही. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले असून त्यांच्या या विजयाची चर्चा सबंध मतदारसंघात रंगू लागल्याने त्यांचा …

Read More »

“अरे लाव तो व्हीडीओ” फँक्टरचा प्रभाव ? मनसेचे इंजिन लावूनही हात-घड्याळ काही चालताना दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यात भाजपा-शिवसेनेला रोखण्यासाठी ऐन निवडणूकीत लाव रे तो व्हीडीओ फँक्टर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आणला. तसेच मोदी-शाह यांना सोडून कोणालाही मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु दुपारपर्यंत निवडणूकीचे निकाल पाहता मनसेचा अरे लाव तो व्हीडीओचा प्रभाव काही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करत नसल्याचे चित्र निकालात पाह्यला मिळत आहे. मनसेप्रमुख …

Read More »

काटे की टक्कर सुरु असलेले मतदारसंघ वंचित परिणाम होत असलेले मतदार संघ

माढा- संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख २८ हजार ४३१ मते रणजितसंह निंबाळकर, भाजपा- २ लाख ३९ हजार ९९ मते विजयराव मोरे, वंचित आघाडी- २२ हजार २७७ मते अमरावती आनंदराव अडसूळ, शिवसेना- २ लाख ५४६ मते नवनीत राणा, अपक्ष-रा.काँ.पुरस्कृत-२ लाख ६ हजार ९७४ मते गुणवंत देवपारे, वंचित आघाडी-२४ हजार ५७२ मते …

Read More »

वंचित आघाडीमुळे राज्यात युतीचीच आघाडी ४४ लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना तर औरंगाबादेत वंचित आघाडी पुढे

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. तर एकट्या औरंगाबादेत वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारी मावळ, शिरूर, अहमदनगर, …

Read More »

पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »