Breaking News

Tag Archives: atul londhe

अतुल लोंढे म्हणाले, त्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण वायुसेनेच्या कार्यक्रमात पंडितजींबरोबरच मौलवींकडूनही प्रार्थना

खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजपा व आरएसएसला घ्यावी लागत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात सर्व धर्माच्या पंडितांकडून प्रार्थना करण्यात आली. …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारने कुटुंबियांना का दिला ? याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव- भाजपा देश के लिए हानिकारक है..

भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. परंतु २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर अतुल लोंढे म्हणाले, दोघांचे मंत्रिमंडळ आणि विस्तार टांगणीवरच विरोधी पक्ष संपवणे व सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचे धिंडवडे

भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्ष संपवून सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून न्यायालयाच्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यामुळे सध्यातरी शिंदे–फडणवीसांचे असंवैधानिक सरकार दोघांचेच राहिल व मंत्रिमंडळ विस्तारही करता येणार नाही तसेच महत्वाचे निर्णयही घेता येणार नाहीत, असा खोचक टोला काँग्रेसचे मुख्य …

Read More »

काँग्रेसचा टोला, पावसाने १०० वर मृत्यू, लाखो हेक्टर शेती पाण्याखाली अन् ‘सरकार’ बेपत्ता.. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात …

Read More »

काँग्रेसचा इशारा; ज्वलंत प्रश्नांकडे वेळीच लक्ष दया अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची-अतुल लोंढे

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे हे देशाच्या हिताचे नाही. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले …

Read More »

काँग्रेस म्हणते, …तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात जाणार शिवसेना संपवण्याच्या राजकारणात भाजपा बंडखोरांचाही वापर करुन त्यांना सोडून देणार

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज खंडपीठाकडे सोपवला असला तरी कायदेशीरबाबींचा विचारविमर्श करता न्यायालयाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. मुळात राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे असंवैधानिक असून या सरकार स्थापनेसंदर्भात आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णयही असंवैधानिकच आहेत, असे परखड मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडले आहे. …

Read More »

ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार

भारतीय जनता पक्ष ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींचे भाजपाशी संबंध उघड झाले असून भाजपाच्या ढोंगी …

Read More »

काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर … घोटाळा २ हजार कोटींचा, का ५ हजार कोटींचा हे आधी ठरवा- अतुल लोंढे

ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पाचारण केल्यानंतर ईडीच्या या कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर आरोप केले. त्या आरोपास उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा …

Read More »

भाजपाची ‘बी’ टीम असलेल्या एमआयएमने काँग्रेसबद्दल बोलू नये खा. इम्तियाज जलील स्वल्पविरामाएवढ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-अतुल लोंढे

काँग्रेस संपलेला पक्ष आहे अशा वल्गना करणारे नेते व पक्ष यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसला संपवणारे संपले, पण काँग्रेस संपलेली नाही आणि संपणारही नाही. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यामुळे एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व …

Read More »

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’ शिवरायांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भाजपा व चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी-! अतुल लोंढे

मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही असे विधान करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी …

Read More »