Breaking News

Tag Archives: ajit pawar

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची मराठी केविलवाणी नाहीच “इये मराठीचिये नगरी” कार्यक्रमातून विधानमंडळात “मराठीचा गजर”

मुंबई: प्रतिनिधी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर  मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वास व्यक्त केला. राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने …

Read More »

फडणवीसांची सूचना अजितदादांचा होकार आणि सुधीरभाऊ म्हणाले मोघम नको कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने औटघटकेचे सरकार भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केले. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच अजित पवारांच्या युटर्नमुळे कोसळले. त्यानंतर हे दोन नेते विधानसभेत कसे एकमेकांना सामोरे जाणार अशी उत्सुकता लागून राहीलेली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नी फडणवीसांनी …

Read More »

अहो फडणवीसजी, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठविलेल्या पत्रांचे काय झाले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना खोचक सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा पत्र लिहून वीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपाचा सावकरप्रेमाचा बुरखा फाडला. वीर सावरकर यांचा विधानसभेत गौरव …

Read More »

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  …

Read More »

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, आमदारांनो सभागृहात रोज हजर रहा महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, दोन्ही सभागृहाचे कामकाज आज लवकर संपले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दररोज सभागृहात हजर रहा असे आदेश दिले. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा …

Read More »

नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जणगणनेसाठी २६ कोटींची तरतूद

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. विशेष म्हणजे या पुरवणी मागण्यात काही नव्या योजनांचा सुतोवाच करण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धरले धारेवर शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार मुद्यावरून गोंधळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रूपये मदतीची मागणी करत या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विधानसभेत केली. मात्र विधानसभा अध्यक्ष …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …

Read More »

शाळा, रूग्णालये, पोलिस, अग्निशामक दलाला पाच दिवसीय आठवड्याचा लाभ नाही सकाळी ९.४५ला कार्यालये सुरू होणार

मुंबईः प्रतिनिधी शासकिय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयातून शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने आदी वगळण्यात आली आहेत. तसेच दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील …

Read More »