नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ Namo Bharat देशाला सुपूर्द करणार आहेत. ते सकाळी 11 वाजता दिल्ली-मेरठ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील साहिबााबाद-दुहाई सेक्शनचे (रेग्युलर रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) उद्घाटन करतील. हा विभाग 17 किलोमीटरचा आहे. यासोबतच काही दिवसांनी रेल्वेने प्रवास दिल्ली आणि मेरठ प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहिबााबादमध्ये ‘नमो भारत’ Namo Bharat या हायस्पीड रॅपिड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ‘वंदे भारत’च्या धर्तीवर या हायस्पीड ट्रेनला ‘नमो भारत’ असे नाव देण्यात आले आहे. दिल्ली-मेरठ मार्गावर या प्रकल्पाचे पाच टप्पे आहेत. उद्घाटनापूर्वी या ट्रेनची ट्रायल रन करण्यात आली आहे. याने ताशी 152 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा आकडा गाठला.
उद्घाटनानंतर उद्यापासून ही हायस्पीड रेल्वे सेवा सुरू होणार आहे. रॅपिड रेल्वे चालवण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) ची स्थापना करण्यात आली आहे. NCRTC ही केंद्र सरकार आणि दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांची संयुक्त कंपनी आहे. या प्रकल्पाचे काम जून 2019 मध्ये सुरू झाले. प्रकल्पाचे उर्वरित टप्पे पूर्ण करण्याची अंतिम मुदत जून 2025 निश्चित करण्यात आली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या विभागात साहिबााबाद-दुहाई डेपो दरम्यान पाच स्थानके आहेत. साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो अशी त्यांची नावे आहेत. महामंडळाचा दावा आहे की, भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच ट्रेन प्रणाली असेल, ज्यामध्ये ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावेल. प्रवाशांना मोबाईल फोन आणि कार्डद्वारेही तिकीट खरेदी करता येणार आहे. स्ट्रेचर रेल्वे कोचच्या शेवटच्या डब्यात असेल. एखाद्या रुग्णाला मेरठहून दिल्लीला रेफर केल्यास त्याच्यासाठी स्वतंत्र कोचची व्यवस्था केली जाते. जेणेकरून कमी खर्चात ते रुग्णापर्यंत पोहोचवता येईल. या ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे.