Breaking News

सामाजिक

राज्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची घोषणा

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. नव्याने निर्माण करण्यात आलेला दिव्यांग कल्याण विभाग तीन महिन्यात दिव्यांगांच्या दारी पोहचला असून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती या …

Read More »

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी या ई-मेल आयडीवर अर्ज करा भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी …

Read More »

बाबरीप्रकरणी निकाल देणारे न्यायाधीश म्हणाले, रामजन्मभूमी प्रकरणी माझ्यावर दबाव…. घरातून तर होताच होता बाहेरूनही दबाव

देशातील राजकिय आणि सामाजिक वातावरण बदलवून टाकणारा आजवरचा बहुचर्चित खटला म्हणजेच अयोध्येतील बाबरी मस्जिद आणि रामजन्मभूमी प्रकरणाचा वाद. बाबरी मस्जिद -रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी निर्णय देणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं असून उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका कार्यक्रमात बोलताना सुधीर चौधरी म्हणाले, रामजन्मभूमी प्रकरणी खटल्याचा …

Read More »

नवीन कामगार नियमांना राज्य सरकारने दिली मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), २०२० या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेखन लिहिणाऱ्यांवर कारवाई करा छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर …

Read More »

नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून सुविधा द्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश

राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहिम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री खाडे बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद …

Read More »

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष …

Read More »

शरद पवार यांचा इशारा; एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये… कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवायचे काम मालकांचे

संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी चार तात्पुरती बस स्थानके उभारणार पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर …

Read More »

परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना संधी देणारे डॉ. राम ताकवले याचं निधन नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, एमकेसीएलचे संस्थापक, पुणे विद्यापाठीचे कुलगुरु

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले यांचे आज निधन झाले. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती. …

Read More »