Breaking News

सामाजिक

संन्यासी माळा घातल्याने ओशो अनुयायी आणि आश्रम व्यवस्थापनामध्ये राडा पुण्यातील आश्रमासमोर झाला राडा अखेर पोलिसांना करावे लागले पाचारण

अध्यात्मिक भारतीय तत्वज्ञान आणि मानवी जीवनाचे सार मांडणारे आणि आपल्या अनोख्या विश्लेषणाच्या आधारे जगात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांच्या पुण्यातील कोरेगांव पार्क येथील आश्रमात संन्यासी माळा गळ्यात परिधान करणे आणि न करण्याच्या कारणावरून आश्रम व्यवस्थापन आणि अनुयायांमध्ये राडा झाला. त्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमावरून केला सवाल, सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्माविरोधात ब्राम्हण समाजातील विचारवंतानीच लढा पुकारला

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका करत सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड असून पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच …

Read More »

शरद पवारांनी सांगितला किस्सा, चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईने ‘गावच्या तहसीलदारापेक्षा…’ अझीम प्रेमजी यांनी चव्हाण सेंटरचा सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि सन्मानाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल शरद पवारानी व्यक्त केली कृतज्ञता...

आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि …

Read More »

मासिक पाळीचे रक्त विकल्याच्या घटनेची महिला आयोगाने घेतली दखल आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश

महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. गेल्या …

Read More »

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅड्स “जन औषधी सुगम"ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

प्रधान मंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJY) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी …

Read More »

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत ०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली …

Read More »

१२ वी प्रश्नपत्रिकेतील त्या चुकलेल्या प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मिळणार ६ गुण राज्य मंडळाच्या बैठकीनंतर सचिव अनुराधा ओक यांची माहिती

नुकत्याच झालेल्या १२ वी परिक्षे दरम्यान इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांच्या ऐवजी मॉडेल उत्तरच छापण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकले होते. ही माहिती पुढे आल्यानंतर विषय तज्ज्ञ आणि मुख्य नियामकांच्या संयुक्त सभेत या चुकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. संयुक्त सभेच्या अहवालानुसार …

Read More »

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करा ९ मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज ९ …

Read More »

आश्वासनांची पुर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे व आहार व इंधनाचे …

Read More »

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, भेदभाव वाढल्याने दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ७५ वर्षा प्रतिष्ठित संस्थांबरोबर सहानुभूतीच्या संस्था निर्माणाची गरज

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत मोठं विधान केलं आहे. उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे दलित आणि आदिवासी समाजातील आहेत, हे संशोधनातून समोर आलं आहे. समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाबद्दल सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अशी …

Read More »