Breaking News

राजकारण

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालावर शरद पवार म्हणाले, मोठा वर्ग बाहेर फेकला… स्वागत आणि सत्कारासाठी दौरे निघालेले नाहीत...

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नुकतेच दिले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट झाले. यापार्श्वभूवीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, या निर्णयामुळे मोठा वर्ग सत्तेच्या, प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल, याची मला चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांना सोबत घेवून भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंच्या …

Read More »

अजित पवार यांचा टोला, उटांवरून शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार… वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी लगावला टोला

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पाहणीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अजित पवार नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजपाच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

सुषमा अंधारे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवसेनेचे शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु …

Read More »

भावना गवळी शिंदे गटात तर त्यांचे घटस्फोटीत पती उध्दव ठाकरे गटात आज अधिकृत रित्या केला प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील शिंदे गटात सामील झाल्या. मात्र भावना गवळी यांचे घटस्फोटीत …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा निर्णय का दिला याचे आर्श्चय, पण पुनर्विचार याचिका दाखल करणार सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूकाच्या आदेशावर दिली प्रतिक्रिया

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे महाविकास आघाडी सरकारनंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे स्वप्न भंगले. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरु करणार की …

Read More »

दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, तुमच्यासाठी काहीतरी केले, तेही सांगा; अन्यथा मी जाहीर करेन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे याना इशारा

तुम्ही माझ्या नातवाच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न केलेत, पण त्याही पेक्षा जास्त मी तुमच्याकरीता काही तरी केलेले आहे. माझ्याही हातून मोठ मोठी कामे झाली आहेत. ते ही लोकांना सांगा. अन्यथा येत्या दोन दिवसात मी प्रसार माध्यमांसमोर मी जे जे काही तुमच्यासाठी केले ते सगळे जाहीर करेन असा सज्जड इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटला असे दिसत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा दिलेला निकाल हा अत्यंत धक्कादायक आहे. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. …

Read More »

अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावर आम्ही दोघेही बघतोय… शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपये आणि जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत करावी

एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील …

Read More »

औरंगाबाद नामांतराचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय उच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार उच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात सत्तांतर होत बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने उध्दव ठाकरेंच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देत त्यासंदर्भातील निर्णय नव्याने घेत तो राज्य …

Read More »