मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, २०१९ च्या निवडणूकीपूर्वीच उद्धव ठाकरे आघाडीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी फोन केला होता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि अविभाजित शिवसेना यांच्यातील प्रदीर्घ युती तुटल्याबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आघाडी केली होती. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येऊ शकले नाही.

“तुम्हाला (उद्धव ठाकरे) बंद दरवाजाआड मुख्यमंत्री बनवले जाईल, असे तुम्हाला समजले असते, तर निदान चर्चा तरी करता आली असती. तुम्ही चर्चा केली नाही कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून ठरवले होते… शरद पवार जी यांची त्यांच्याशी निवडणूकपूर्व राजकिय समझौता केला होता.

भाजपाचे नेते शनिवारी पुण्यात जयपूर डायलॉग्स या उजव्या विचारसरणीच्या वेबसाइटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर २.५ वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली, तेव्हा त्यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. पण त्यांनी पूर्ण नकार दिला होता असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, ते उद्धव ठाकरेंना म्हणाले, आम्ही तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ शकत नाही. आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत आणि भविष्यातही सर्वात मोठा पक्ष असू, त्यामुळे ५ वर्षे मुख्यमंत्रीपद आमच्याकडेच राहील. गेल्या वेळी आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिले नव्हते. आम्ही यावेळी ते देऊ शकतो.

त्यावेळी युती तुटल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मात्र ठाकरे चार दिवसांनी चर्चेसाठी पोहोचले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी सोडून दिली होती आणि त्याऐवजी ते पालघर लोकसभेची जागा मागत होते. अमित भाई आणि इतरांनी मला सांगितले की ते आमचे जुने भागीदार आहेत. ‘एका सीटने काही फरक पडत नाही; तुम्ही त्यांना ती जागा द्या’. म्हणून आम्ही त्यांना उमेदवारासह जागा दिली, असल्याचेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी असेही सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी नंतर अमित शाह यांना पत्रकार परिषदेपूर्वी भेटण्याची विनंती केली, जिथे ते सुमारे १० मिनिटे खाजगीत बोलले.

या बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, दोन्ही पक्षांच्या मान्यतेनुसार ते पत्रकार परिषदेत बोलले, परंतु उद्धव ठाकरे यांनी नंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांचे सर्व पर्याय खुले आहेत. ज्या दिवशी त्यांचे (महा विकास आघाडी) सरकार स्थापन झाले, त्या दिवशी मी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या फोनलाही उत्तर देण्यास नकार दिल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *