Breaking News

राज्यात कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत विक्रमी नोंद : ३० हजाराचा टप्पा पार १८४२ रूग्णांचे निदान, ७ हजाराहून अधिक रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १६०६+३६=१८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे.
मागील काही दिवसांपासून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र ही वाढ ४५ ते ५७ या संख्येच्या प्रमाणातच होती. त्यामुळे किमान मृतकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत होते. परंतु आज एकदम ६७ रूग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यतच्या मृतकांच्या संख्येत ११३५ वर पोहोचली आहे.
रूग्ण बरे होवून घरी जाण्यांच्या संख्येत म्हणावी तशी प्रगती नसली तरी आज ५२४ रूग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत ७०८८ रूग्ण बरे झाले आहेत.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )
मृत्यू –
राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये ( ६६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११३५ झाली आहे. आज नोंदविण्यात आलेल्या एकूण मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,६१,७८३ नमुन्यांपैकी २,३१,०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०,७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,४३४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६०.९३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
. सध्या राज्यात ३,३४,५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७,०४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १८५५५ ६९६
ठाणे           २०५
ठाणे मनपा १४१६ १८
नवी मुंबई मनपा १२८२ १४
कल्याण डोंबवली मनपा ५०२
उल्हासनगर मनपा १००
भिवंडी निजामपूर मनपा ४६
मीरा भाईंदर मनपा २८३
पालघर ५०
१० वसई विरार मनपा ३४० ११
११ रायगड २१८
१२ पनवेल मनपा १९६ १०
  ठाणे मंडळ एकूण २३२०९ ७६८
१३ नाशिक १०२
१४ नाशिक मनपा ६६
१५ मालेगाव मनपा ६६७ ३४
१६ अहमदनगर ५६
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे १०
१९ धुळे मनपा ६७
२० जळगाव १९३ २६
२१ जळगाव मनपा ५७
२२ नंदूरबार २२
  नाशिक मंडळ एकूण १२५६ ७८
२३ पुणे १८९
२४ पुणे मनपा ३३०२ १७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५६
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३६२ २१
२८ सातारा १३१
  पुणे मंडळ एकूण ४१४९ २१२
२९ कोल्हापूर २१
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
३४ रत्नागिरी ९१
  कोल्हापूर मंडळ एकूण १७३
३५ औरंगाबाद ९७
३६ औरंगाबाद मनपा ७७६ २५
३७ जालना २१
३८ हिंगोली ६६
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ९६६ २६
४१ लातूर ३३
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ५४
  लातूर मंडळ एकूण १०१
४७ अकोला १९
४८ अकोला मनपा २१७ १३
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ९६ ११
५१ यवतमाळ ९९
५२ बुलढाणा २६
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ४६६ २८
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३५०
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ३६१
  इतर राज्ये ४१ १०
  एकूण ३०७०६ ११३५

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *