Breaking News

Tag Archives: madhya pradesh

मध्य प्रदेशात रस्ते बांधणीला विरोध करणाऱ्या दोन महिलांना जीवंत पुरण्याचा प्रयत्न खाजगी जमिनीवर रस्ता बांधणीचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील दोन महिला या भागात रस्ता बांधकामाला विरोध करत असताना ट्रकमधून खडी-माती त्या महिलांच्या अंगावर तशीच टाकण्यात आली विशेष म्हणजे त्या महिलांचा विरोधात होत असतानाही संबधित ठेकेदाराना महिलांवरच खडी माती टाकल्याने त्या महिला माती आणि खडीच्या ढिगाऱ्यात अर्धवट पुरल्या गेल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरची घटना शनिवारी …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णय; हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्यातील विवाह वैध नाही मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका आंतर-विवाह करणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला, या जोडप्याने विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत त्यांचे विवाह नोंदणीकृत केले आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड लॉ नुसार मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्यातील विवाह अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवले. जोडप्याने पोलिस संरक्षण मागणारी याचिचा मध्य प्रदेश उच्च …

Read More »

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र देशाच्या राजकारणात पाह्यला मिळू लागले. त्यातच गुजरातमधील सूरत येथे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवित भाजपा उमेदवाराला बिनविरोध घोषित केले. अगदी त्याच पध्दतीने मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत …

Read More »

नीती आयोगाचा सर्वात मोठा दावा, २४.८ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेतून बाहेर

कोरोना काळापासून देशातील प्रमुख आर्थिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असताना आणि वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने कोरोना काळापासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत अन्न पुरवठा करण्याचा निर्णय घेत ८० कोटी नागरिक या मोफत धान्याचा लाभ घेत असल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यातच आज केंद्र …

Read More »

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, २८ आमदारांचा नव्याने समावेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने विजय मिळवित सत्ता कायम राखली. त्यानंतर मागील ७ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याऐवजी राज्याची धुरा अर्थात मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांची निवड केली. या साऱ्या घटनेला १२ दिवसही पूर्ण होत नाही तोच मध्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला. १२ …

Read More »

पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, वैचारिक लढा सुरुच…

देशातील पाचपैकी चार राज्यातील निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. छत्तीसगड, राजस्थान बरोबर मध्य प्रदेश मध्येही काँग्रेसला कौल मिळेल अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित करत चांगलेच कोंडीत पकडत होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत एक …

Read More »

… निवडणूकीमुळे या सामाजिक परिवर्तनाला गती मिळेल?

मध्य प्रदेश परिवर्तनाच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या बदलाला गती मिळेल का? कोणत्याही राजकीय बदलामुळे या राज्यात खोल पण दीर्घकाळ रखडलेल्या सामाजिक बदलाचा मार्ग मोकळा होईल का? की, राज्याच्या स्थापनेपासून राज्यावर वर्चस्व असलेल्या शक्तिशाली सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणाऱ्या राजकीय डावपेचांचा आणखी एक काळ आपल्याला पहायचा आहे का? मध्य …

Read More »

मध्य प्रदेश निवडणुकीत खरा प्रश्न कोणी विचारत नाही….

मध्य प्रदेश बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अखेर त्याला चालना मिळेल का? राजकीय बदलामुळे राज्यात सखोल आणि विलंबित सामाजिक वळणाचा मार्ग मोकळा होईल का? की आपण राजकीय डावपेचांच्या दुसर्‍या टप्प्यात आहोत जे राज्याच्या स्थापनेपासून प्रबळ सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करते? मध्य प्रदेशातील सध्या सुरू असलेल्या निवडणूक लढतीबद्दल विचारण्याचा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांचा उमेदवार म्हणून प्रीट हिट द्यायची अन् आम्ही काय केल तर…

सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. त्यामुळे त्याचे काही नियम असतात. तशी निवडणूक असली की त्याची आचारसंहिता असते. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या आणि अयोध्या वारीच्या नावावर मतं मागितल्याचे सर्वांनी पाह्यलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल केला असेल तर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, आणि संपली की…

निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि …

Read More »