Breaking News

Tag Archives: kisan sabha morcha

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी देण्याचे सरकारचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी नाशिकहून मुंबईला काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला राज्य सरकारकडून तितकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी मिळणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांची कर्जमाफी होणार आहे. नाशिकहून निघालेला हा लाँगमार्च मुंबईकरांची तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी रात्रीच आझाद मैदानावर आला. …

Read More »

मोर्चेकऱ्यांसाठी अशीही सेवा… सोलार पँनलच्या माध्यमातून मोबाईल चार्जींगची सुविधा

मुंबई : बी.निलेश शेतकरी, आदीवासी आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या न्याय मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई दरम्यान अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरी लाँग मार्च काढला. मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींचा मोबाईल फोन डिसार्च होवून त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटू नये याउद्देशाने नथू निवृत्ती उदार या शेतकऱ्याने एक ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले. विशेष म्हणजे …

Read More »

सरकारशी चर्चा सकाळीच… मुंबईकरांना त्रास होवू नये म्हणून मोर्चा रात्रीतच आझाद मैदानावर पोहोचणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, आदीवासी यासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर किसान सभेने जरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा त्रास मुंबईच्या चाकरमान्यांना होवू नये यासाठी रात्री १२ नंतर सोमय्या मैदानावरून आझाद मैदानाकडे निघणार असून रात्रीत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना विना …

Read More »

मुनगंटीवार, बापट, फुंडकर, सवरांना मुख्यमंत्र्यांनी बोलाविले मोर्चेकऱ्यांच्या प्रश्नी चर्चा करण्यासाठी तातडीने हजर राहण्याचे मंत्र्यांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांसह, आदीवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नी किसान सभेने काढलेल्या लाँग मार्चची राज्य सरकारने उशीराने का होईना दखल घेत त्यांच्या मागण्याप्रमाणे तोडगा काढण्यासाठी संबधित मंत्र्यांना तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविले आहे. या मंत्र्यामध्ये अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, कृषी मंत्री …

Read More »

आणि शिवसेनेचे आदरातिथ्य मोर्चेकऱ्यांनी नाकारले पाणी स्विकारू पण इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी नाही

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर किसान सभेने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या मोर्चा असल्याने शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांचे स्वागत करत पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतलीत म्हणून तुमचे पाणी स्विकारू पण खाण्याच्या-पिण्याच्या गोष्टी स्विकारणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे आदारातिथ्य नाकारल्याची माहिती …

Read More »

शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीचाही किसान सभेच्या मोर्चाला पाठिंबा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होणार सहभागी, विखे-पाटीलही सहभागी होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी मोर्चा डाव्यांच्या किसान सभेने काढलेल्या मोर्चाला आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सहभागी होणार असल्याची …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोन कट्टर राजकिय शत्रू एकत्र भाजप विरोधासाठी शिवसेनेची आंबेडकरवाद्यांपाठोपाठ आता डाव्यांना मदत

मुंबई : प्रतिनिधी एकेकाळी मुंबईतील लाल बावटा अर्थात डाव्यांचा राजकिय वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले. त्यात त्यांना चांगल्यापैकी यशही मिळाले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते शिवसेना आणि डावे यांच्यात राहीले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि भाजप विरोधासाठी लाल बावट्याच्या साथीला आता शिवसेनाही धावली असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. …

Read More »