राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र …
Read More »मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची …
Read More »फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरा पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश
राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार
मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली. पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन …
Read More »शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य …
Read More »शिवाजी महाराजांशी संबधित गड-किल्ल्यासाठी उच्चाधिकार समिती राज्य मंत्रिमंडळाच्या टिपणीत सुधारणा
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या पर्यटनाबरोबरच महसूली उत्पन्नवाढीसाठी राज्यातील गड-किल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, पार्टीकरीता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावर राज्यातील सर्वचस्तरातून टीकेची झोड उठल्याने अखेर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित गड-किल्ल्यांना विकसित करण्यासाठी उच्चाधिकारीची स्थापना करत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या टिपणीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती …
Read More »चुकीच्या माहितीच्या आधारे टीका नको ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोणत्याही किल्ल्यावर हॉटेल नसल्याचा भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची सारवासारव
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवलेल्या कोणत्याही ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यावर हॉटेल होणार नाही. पर्यटन खात्यातर्फे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे किल्ले हे कोणत्याही संरक्षित किल्ल्यांच्या यादीतील नाहीत, असे असताना विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करत असून ते जनतेमध्ये संभ्रम पसरवत असल्याची सारवासारव भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी …
Read More »शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या वैभवशाली वारशाचा खेळ करु नका पवित्र गडकिल्ल्यांवर बाजार न मांडण्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक आहे. शिवरायांच्या वैभवशाली वारसा स्थळांवर बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने …
Read More »राज्यात गुंतवणूकीची गरज मात्र सरकारकडून मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी काश्मीरात रिसॉर्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरीता अधिक गुंतवणुकीची गरज आहे. मात्र महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरीता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरीता काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेत जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश …
Read More »काश्मीरात रिसॉर्ट बांधणीसाठी महाराष्ट्र सरकार विकत घेणार जमीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील कोणत्याही जनतेला जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधण्याची योजना असून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधण्यासाठी जमिन …
Read More »