मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गरजा आणि राज्याची विकास क्षेत्रे याबाबत पंधराव्या वित्त आयोगासमोर तर्काधारित सादरीकरण करताना राज्याला नियमितस्वरूपात प्राप्त होणाऱ्या तरतुदींव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक- आर्थिक विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई …
Read More »सादरीकरणावरून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई माहीती व जनसंपर्क आणि अर्थमंत्री कार्यालयाकडून स्वतंत्र दावे
मुंबईः प्रतिनिधी सध्याच्या राज्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या वित्त आयोगासमोर आज राज्य सरकार तर्फे आर्थिक परिस्थितीचे चित्र दाखविणाऱ्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. मात्र या सादरकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून श्रेय लाटण्यासाठी परस्पर दावे करण्यात येत आहेत. तसेच वित्त आयोगासमोर करण्यात आलेले सादरीकरण आपणच केल्याचा दावा …
Read More »वित्त आयोगाकडून राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत आधी चिंता नंतर प्रशस्तीपत्रक राज्याची समाधानकारक प्रगती होत असल्याचा आयोगाला विश्वास
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे वित्त आयोगाने आपल्या प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले. मात्र या दोन दिवसात सरकारने चांगली बडदास्त ठेवताच वित्त आयोगाला उपरती होत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून प्रगतीपथावर घौडदौड करत असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यापेक्षा राज्याची …
Read More »महाविद्यालयांकडून फि वाढविणार नसल्याचे पत्र घ्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची कुलपती आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
मुंबई : प्रतिनिधी ‘स्वयं अर्थसहाय्यीते’चा (सेल्फ फायनांन्स) दर्जा प्राप्त झाल्यावर मनमानी पद्धतीने अभ्यासक्रमांचे शुल्क आकारणार्या अभियांत्रिकी संस्थांना चाप बसविण्यासाठी संस्थांना स्वयं अर्थसहाय्यतेचा दर्जा देतानाच संस्थांकडून थेट शुल्क न वाढविण्याचे नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विद्यापीठांचे कुलपती चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री …
Read More »महसूल सचिवांचा विरोध तर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा घाट शासकिय जमिनी मालकी हक्काने देत सरकार २८ हजार कोटींवर पाणी सोडणार
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीत जमिन खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होते. परंतु या शासकिय जमिनी बिल्डरांच्यां फायद्यासाठी नाममात्र शुल्क आकारून मालकी हक्काने देण्याचा घाट राज्य सरकार कडून आखण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नाममात्र शुल्क आकारणीचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घालण्यात येत असून त्यास …
Read More »उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्रात ओबीसींचा दर्जा द्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
मुंबई : प्रतिनिधी यूपी, बिहार, मध्य प्रदेश येथे या समजाला ओबीसी मानले जाते. मात्र महाराष्ट्रात त्यांची आडनावे ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होत नाही. त्यामुळे यूपी, बिहारमधील मुंबईत राहणाऱ्या या समजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणी केल्याचे मुंबई …
Read More »मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा
औरंगाबाद :प्रतिनिधी मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजिवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन …
Read More »प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांचे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावे आमदार समितीची राज्य सरकारला शिफारस
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर या अनेक प्रकल्प विकासकांनी असेच सोडून दिलेले असल्याने विकासकांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेवून त्याचा पुर्नविकास करावा अशी शिफारस मुंबई शहरातील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या आमदार …
Read More »गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाराजांची भाजप नेत्यांच्या घरी गाठी-भेटी कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षिरसागर भाजपच्या रांगेत
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. परंतु राजकिय क्षेत्रात यानिमित्ताने एका पक्षातील नाराजांनी सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या घरी गाठ-भेटी घेण्याच्या मार्गाला लागले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते आणि अडगळीत पडलेले कृपाशंकर सिंह यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला …
Read More »