Breaking News

Tag Archives: chief minister

नाना पटोलेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खोचक टोला, राज्यात टाईमपास सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारकडे इच्छाशक्तीच नाही

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे …

Read More »

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका

दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …

Read More »

एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले

बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री …

Read More »

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …

Read More »

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची पाठ मात्र गडकरी, मुख्यमंत्री हजर नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न

भाजपाचे नेते तथा केंद्रीय कृषीमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण नाशिक येथील नांदूर शिंगोटे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थितीत करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, एकनाथ शिंदेंचे चांगले व्हावं हिच आमची सदिच्छा, पण आता कुठे सुरुवात… चंद्रशेखर बानवकुळे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून शिंदेना काढला चिमटा

भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

जयंत पाटील यांचे भाकीत,…तर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय. परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतला हा निर्णय मृत्यूनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशातील प्रमुख राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्राचही विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जून्या पेन्शनचा मुद्दा हा कळीचा बनला. त्यानंतर राज्यातील सर्व शासकिय-निमशासकिय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची घोषणा देत संप सुरु केला. सुरुवातीला या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती, शेतकरी लाँग मार्चच्या ‘या’ मागण्या मान्य शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां …

Read More »

नाना पटोलेंचा टीका, सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार …

Read More »