शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची माहिती, विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित मान्यता
विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ कोटी ३९९ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकलपांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… दडपशाही धोरणामुळे लोकशाही धोक्यात
देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही …
Read More »केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ट्विटरवरून मुस्लिम लीगवर बंदी नव्या कायद्यातंर्गत युएपीए कायद्याखाली केली कारवाई
देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी असलेल्या ३७० कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा देण्यात आला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या अजेंढ्यावरील विषयाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० च रद्द केले. त्याचबरोबर या राज्याचा दर्जाही काढून घेतला. संसदेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …
Read More »अमोल कोल्हे यांचा टोला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर म्हणतात शेतकऱ्यांच सरकार पण…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे सर्वसामान्यांचे प्रश्न …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसे भाजपाच्या हुकूशाहीलाही पाठवू…
देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी …
Read More »संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…
तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …
Read More »शालिनीताई पाटील यांची भविष्यवाणी, तर अजित पवार तीन महिन्यात तुरूंगात
राज्यात १०५ कोटींचा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहोत असे सांगतानाच स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री मिळविण्यासाठी बंद करणारे अजित पवार पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील त्यांना कोणत्याही निवडणूका लढविता येणार नाही असा खळबळजनक दावा माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केला. शालिनीताई पाटील म्हणाल्या की, …
Read More »रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपाने सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी वापरण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी …
Read More »