मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कार्यरत झालेल्या वन विभागाचा पदभार नवे वनमंत्री संजय राठोड यांनी स्विकारताच त्यांनी ३१ कलमी आदेश जारी केले. तसेच या आदेशान्वये एका झटक्यात वृक्ष लागवड योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देत असल्याचे जाहीर करत कांदळवन तोडल्याप्रकरणाचे अधिकार जिल्हा वनसंरक्षकास देण्याचा निर्णय घेत …
Read More »रत्नागिरी, सिंधुदूर्गसह चार ठिकाणच्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठाची आढावा बैठक घेताना त्यांनी वरील निर्देश दिले. …
Read More »घरे पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे उद्योजक, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री ठाकरेंची ग्वाही
औरंगाबाद: प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब जनतेच्या दैंनदिन समस्या अनेक आहेत. घरे पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे असे सांगत अनेक राजकिय अडचणींवर मात करून हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून या शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचं असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांना केला “मानाचा मुजरा” सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीद वाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनविणार महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या …
Read More »दिव्यांगांसाठी वेगळा विभाग आणि महापोर्टल बंद करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या …
Read More »मेट्रो कारशेडचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची ग्वाही आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती
मुंबईः प्रतिनिधी विकास हा होणारच आहे. मात्र आपली समृद्धी नष्ट करणारा विकास अपेक्षित नाही. आमचा मेट्रोला विरोध नाही. मात्र त्याविषयी सविस्तर माहिती घेतल्याविना तेथील झाडांचे एकही पान तोडता येणार नसल्याचे सांगत कारशेड प्रकल्पाला स्थगिती देत याचा आढावा घेतल्याशिवाय कारशेडच्या कामाला प्रारंभ केला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, रात्रीस चालेचा नवा खेळ सुरू झालाय संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपावर टीका
मुंबईः विशेष प्रतिनिधी मध्यरात्रीपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने पवारसाहेबांनी चित्र स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हा खेळ सुरु आहे, तो लाजिरवाणा आहे. नवं हिंदुत्व दाखवलं जात आहे. ते हिंदुत्व नाही. ईव्हीएमचा खेळखंडोबा पुरला नाही म्हणून हा रात्रीस खेळ चालेचा खेळ सुरू केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भल्या पहाटे स्थापन झालेल्या …
Read More »शिकाँराच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेची निश्चिती झाली असून या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे राहणार आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सहमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. वरळी येथील नेहरू सेंटर येथील एका पंचतारांकित …
Read More »शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा..मात्र काँ.रा.कडून पाठिंब्याचे अधिकृत पत्र नाही शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ सुटण्याची शक्यता दिसत असताना शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा दाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप पाठिंब्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा आणखी काही दिवस चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला असून आणखी दोन दिवसाचा अवधी देण्यास राज्यपालांनी नकार …
Read More »