Breaking News

Tag Archives: अॅआशिष शेलार

आशिष शेलार यांचा पलटवार, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!

मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर …

Read More »

या चार मानाच्या श्री गणेशांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन चारही ठिकाणी सत्कार स्विकारत घेतले दर्शन

महाराष्ट्रात सध्या गणेशोस्तव धुमधडाक्यात सुरु आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खास मुंबईच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांसह आले. मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर मुंबईतील वैशिष्टेपूर्ण असलेल्या मानाच्या चार गणरायांचे दर्शन सत्कार स्विकारत घेतले. जाणून घेऊ या गृहमंत्री अमित शाह यांनी कोणकोणत्या गणरायाचे दर्शन घेतले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा …

Read More »

बार्टीच्या प्रश्नावरून भाजपा आणि पवार गटाच्या नेत्यांनी धरले शिंदे गटाच्या मंत्र्याला कोंडीत अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आश्वासन उत्तर सुधारून देण्याचा प्रयत्न

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे विधानसभेत दिसून आले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचा दाखवून माथी भडकवण्याचा डाव

राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा …

Read More »

अॅड आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर,…त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व देत नाही घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातील प्रतिक्रिया देणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करत भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात …

Read More »