Breaking News

एकत्र जाऊनही एकमेकांकडे न पाहणारे, नंतर मात्र मुख्यमंत्री म्हणाले, ये फेव्हिकॉल का मजबूज जोड

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याचा एका सर्व्हेचा अहवाल देत बहुतांष प्रसारमाध्यमांमध्ये मोठ मोठ्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये खट्टास निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या वादप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे गटाने पहिल्या जाहिरातीत राहुन गेलेल्या त्रुटी दुरूस्त करत सुधारीत जाहिरात प्रकाशित केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यादांच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे पालघर येथील एका शासकिय कार्यक्रमासाठी एकत्र आले. मात्र सुरुवातीचा बराच काळ एकमेकांकडे न पाहता आणि चेहऱ्यावरील नाराजीचे भाव लपवून ठेवणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी कालांतराने मात्र आमची दोस्ती तुटायची नाही आणि ये फेव्हीकॉल का मजबूत जोड सारखी वक्तव्य करत बेबनाव नसल्याचे एकप्रकारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

पालघरमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे अशी चर्चा असतानाच दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले.
दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा सुरू होती, हे कळलं नसलं तरीही दोघांच्या चेहऱ्यावरील भाव हास्याचे असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सध्याचं चित्र आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही आज टीप्पणी केली.

माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून दोस्ती आहे. ही दोस्ती जिवाभावाची मैत्री आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही जण म्हणतात जय वीरू की जोडी, काहीजण धरम-वीरची जोडी म्हणतात, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिरात वादानंतर कटुता राहिली नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

तसेच ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना सामान्य जनतेने बाजूला केलं, अशी टीकाही शिंदेंनी यावेळी महाविकास आघाडीवर केली.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे, असं म्हणत जाहिरात वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *